मच्छिमारांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना अर्थसहाय्य

मच्छिमारांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना अर्थसहाय्य

LetsUpp | Govt.Schemes

मासेमारी (Fishing)करीत असताना अपघाती मृत्यू (accidental death)झालेल्या मच्छीमारांच्या वारसांना अर्थसहाय्य (financial assistance)देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून देण्याचा निर्णय 1 एप्रिल 2008 घेण्यात आला.

योजनेची अट : या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात होणे गरजेचे आहे.

कोणत्या कागदपात्रांची आवश्यकता? :
▪ पोलीस ठाण्यातील अपघाताची नोंद
▪ ग्राम पंचायतीकडुन मिळालेले मृत्यु, वारस प्रमाणपत्र
▪ जन्म-मृत्यू दाखला
▪ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे क्रियाशिल मच्छिमार असल्याचे प्रमाणपत्र
▪ मृत्युचे कारण दाखविणारा वैदयकिय दाखला

दिला जाणारा लाभ : मच्छिमाराचा अपघाती मृत्यू किंवा बेपत्ता झाल्यास त्यांच्या वारसांना 1 लाख रुपये /- अर्थसहाय्य दिले जाते.

येथे संपर्क साधावा : आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube