Irshalwadi Landslide : दोन दिवसांनंतरही १०५ बेपत्ता, आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

Irshalwadi Landslide : दोन दिवसांनंतरही १०५ बेपत्ता, आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळण्याच्या घटनेला आता 48 तास उलटून गेले आहेत. या भीषण दुर्घटनेत 22 जणांना आपला जीव गमवावा लागला तर अजूनही शंभर पेक्षा जास्त या लोक या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले असून त्यांचा पत्ता लागलेला नाही. चिखलाने भरलेली पायवाट तुडवत बचावाचे कार्य सुरुच आहे.

या दुर्घटनेनंतर गुरुवारी दिवसभर शोधकार्य राबविण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी पहाटे पुन्हा सुरू करण्यात आले. एनडीआरएफ, टीडीआरएफ, स्थानिक सामाजिक संस्था, ट्रेकर्स ग्रुप आणि अन्य संस्थांचे मिळून एकूण 900 जण या बचाव कार्यात सहभागी झाले होते. या गावात रस्ता नसल्याने पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा हातात टिकाव, फावडे घेऊन हातानेच गाळ उपसत दबल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. पाऊस तर थांबण्याचे नाव घेत नव्हता. खराब हवामानाचा बचावकार्यात वारंवार अडथळा येत होता.

Nana Patole : इर्शाळवाडीच्या घटनेतून बोध घेत गाडगीळ समितीच्या शिफारशी मान्य कराव्या

गुरुवारी दिवसभरात 16 जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले.  या दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढत चालला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांचा समावेश आहे. अद्यापही 105 जण अजूनही बेपत्ता आहे. या बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध अजूनही सुरुच आहे. पावसानंतर येथे आता साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रोग पसरू नयेत म्हणून येथे आता औषध फवारणी केली जात आहे. आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.

Irshalwadi Landslide : 36 तासांची झुंज यशस्वी! मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या महिलेसाठी जवान ठरले ‘देवदूत’…

२२ जणांचा मृत्यू

शुक्रवारी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफ या यंत्रणांनी आज पुन्हा मातीचा ढिारा उपसायाच्या कामाला सुरूवात केली. डोंगर कोसळल्याने घरांवर सुमारे 15 ते 20 फूट माती साचली होती. आज पहाटे ढिगारा उपसायाला सुरूवात झाल्यानंतर आत्तापर्यंत आणखी 6 मृतदेह हाती लागले आहेत. त्यामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube