संसद भवनाच्या उद्घाटनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, या सोहळ्याला वादाची..

संसद भवनाच्या उद्घाटनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, या सोहळ्याला वादाची..

Raj Thackeray on New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज संसद भवनाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन (New Parliament Building Inauguration) करण्यात आले. या कार्यक्रमावर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं, असे राज ठाकरे म्हणाले.

आज देशाच्या नवीन संसद भवनाचं लोकार्पण झालं. संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. या सोहळ्याला उगाचच वादाची किनार लागली. ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, या वास्तू निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

‘माझ्यासाठी दिल्ली अजून खूप दूर’; लोकसभेच्या उमेदवारीवर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मोदी सरकारवर टीका केली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेच्या उलट घडामोडी संसद भवन उद्घाटन सोहळ्यात चालल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक भारताची संकल्पना नेहरूंनी मांडली. पण आपण पुन्हा एकदा देशाला काही वर्ष पाठीमागे घेऊन जात आहोत की काय अशी काळजी वाटायला लागली आहे.

भारताला विकसित राष्ट्र बनवायचे

संसद भवनाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, 2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. या 25 वर्षात आपल्याला भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. लक्ष्य मोठे आणि कठीण आहे. पण प्रत्येक नागरिकाला प्रयत्न करावे लागतील. नवीन संकल्प घ्यावे लागणार आहेत. विकसित भारताच्या निर्माणात संसद भवन प्रेरणा देईल. संसदेत लोकप्रतिनिधी बसतील ते लोकतंत्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतील. राष्ट्र प्रथम या भावनेने पुढे जावे लागेल. व्यवहारावरुन उदाहरण समोर ठेवावे लागेल. स्वतःमध्ये निरंतर सुधारणा कराव्या लागतील. नवीन रस्ते स्वतःच तयार करावे लागतील. लोकहितालाच ध्येय बनवावे लागेल. जबाबदारीचे पालन करावे लागेल, असे मोदी म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube