आम्ही आरोप करायला गेलो तर अजितदादांची अडचण होईल; रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर

Ravindra Chavan On Ajit Pawar : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु झालं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

Ravindra Chavan On Ajit Pawar

Ravindra Chavan On Ajit Pawar : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु झालं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर देत आम्ही जर आरोप करायला गेलो तर अजितदादांना (Ajit Pawar) अडचण होईन असं म्हटलं आहे. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण बोलत होते.

या पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) म्हणाले की, अजित पवार यांनी स्वत: च्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. खरं तर आरोप -प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेले तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं या पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले.

या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, यंदाची निवडणूक ही पुण्याच्या विकासासाठी आहे. येथील जनतेला नागरी सुविधा चांगल्या पद्धतीने कोण देऊ शकते, याचा प्रश्न आहे आणि हेच सांगायला मी इथे आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi)नेतृत्वात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्रात असलेलं एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे गतिमान सरकार कसं असावं याचं उदाहरण सेट करत आहे. पुण्यात नरेंद्र मोदी सरकार आणि फडणवीस सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहेत. पायाभूत प्रकल्पांची कामं वेगाने केली जात आहेत. कोट्यावधी रुपये पुण्याच्या विकासासाठी दिले जात आहे असं रवींद्र चव्हाण म्हणाले.

Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? अजितदादा म्हणाले, ‘तुझ्या तोंडात साखर पडो…’-

तसेच पुणे महापालिकेत मेट्रोचा ठराव झाला मात्र केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही महाविकास आघाडीला पुण्यात मेट्रो सुरु करता आली नाही कारण त्यांना ती करायची नव्हती. मोदी सरकार आल्यावर पुण्यात मेट्रो सुरु झाली आणि आज 33 किलोमीटरचे जाळे मेट्रोचे पुण्यात आहे असं देखील यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले.

तर दुसरीकडे पिंपरी -चिंचवड महापालिकेत गेल्या सात वर्ष भाजपने प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप माध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. पिंपरी -चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

follow us