संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यानं नव्या वादाला तोंड; ठाकरे गटाची घणाघाती टीका

संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यानं नव्या वादाला तोंड; ठाकरे गटाची घणाघाती टीका

Sambhaji Bhide : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकणारे श्री शिवप्रतिष्ठानचे (Shri Shivpratisthan)संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचे एखादे वक्तव्य नाही तर संपूर्ण भाषणच वादात सापडले आहे. या भाषणात भिडे यांनी 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. संपूर्ण देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन (independence day) दुःखाचाही आहे. त्या दिवशी कडकडीत उपवास करायचा, असं संभाजी भिडे म्हणाले, त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group)आमदार सचिन अहिर (Sachin Ahir)यांनी जोरदार टीका केली आहे. (shivsena-thackeray-group-aggressive-on-sambhaji-bhide-sachin-ahir)

धर्मग्रंथांना तरी सोडा; सेन्सॉर बोर्ड काय करतं? न्यायालयाने आदिपुरुषच्या निर्मात्यांसह सेन्सॉर बोर्डलाही फटकारलं

संभाजी भिडेंनी स्वातंत्र्यावर बोलताना महात्मा गांधींवर निशाणा साधत जोरदार टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, स्वातंत्र्याची चळवळ सुरु असतानाच महात्मा गांधी पहिल्या दिवसापासूनच ब्रिटिशांची पाठराखण करणारे वर्तन करत आले. महात्मा गांधींची स्वातंत्र्य मिळवून देतो म्हणणारी वक्तव्य म्हणजे लफंगेगिरी होती. अशा प्रकराची वादग्रस्त विधानं केली.

1947 मध्ये मिळालेलं हांडगं स्वातंत्र्य; महात्मा गांधींसह संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवर भिडे गुरुजींची टीका

त्याचबरोबर राष्ट्रगीतावरही आक्षेप घेत हे आपलं राष्ट्रगीत नसल्याचं म्हटलं आहे. जन, गण, मन हे पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी टागोरांना सुचलं होतं. काय लायकीचे लोकं, काय लायकीचं स्वातंत्र्य अन् काय झेंडावंदन असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करीत 1947 मध्ये मिळालेलं ते हांडगं स्वातंत्र्य असून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मानू पण फक्त दखलपात्र म्हणून, असं ते म्हणाले आहेत.

संभाजी भिडेंच्या या वादग्रस्त भाषणावरुन आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या या भाषणावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी टीका केली आहे.

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर आमदार अहिर म्हणाले की, ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसताना अशी वादग्रस्त वक्तव्य करुन लक्ष वळवण्याचं काम केलं जात आहे. एक नवीनच इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण त्याचवेळी भिडेंनी 15 ऑगस्ट काळा दिवस जाहीर करायचा असं वक्तव्य केलं त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे, अशी घणाघाती टीका केली आहे.

त्याचवेळी आमदार अहिर म्हणाले की, फाळणी किंवा आणीबाणीसारखे विषय समोर आणले जात आहेत. मात्र एकता आणि अखंडतेसाठी जे हुतात्मे झाले, ज्यांनी बलिदान दिलं, त्या सर्वांचा अपमान करण्याचं काम दुर्दैवाने आज केलं जात आहे, अशी जोरदार टीका यावेळी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube