Weather Update : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ अन् ‘अवकाळी’! आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळ’धार’

Weather Update : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ अन् ‘अवकाळी’! आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळ’धार’

Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Weather Update) कहर केला आहे. या अवेळी होत असलेल्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही पाऊस थांबलेला नाही. आता तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे लवकरच चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. तसेच वेस्टर्न डिस्टर्बनमुळे राज्यात पुढील 24 तासांत अनेक ठिकाणी जोरदार (Rain Alert) पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. या ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल अशी शक्यता आहे. अकोला, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Rain Alert : पुणे-नगरकरांनो सावधान! आजही ‘अवकाळी’ बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नैऋत्य बंगालच्या उपसागरातील दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. हे चक्रीवादळ वेगाने पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने सरकत आहे. आता पुढील बारा तासात या वादळाचे खोल दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होईल आणि 3 डिसेंबरपर्यंत नैऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळात (Cyclone Michaung) रुपांतरीत होईल. त्यामुळे 2 ते 4 डिसेंबर दरम्यान अनेक राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन दिवसांत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, असा अंदाज आहे.

दक्षिण पूर्व बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मिचॉन्ग चक्रीवादळाचा धोका तयार झाला आहे. हे संभाव्य वादळ दक्षिण भागात धडकणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. वादळ सोमवारी पहाटे पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. उत्तर तामिळनाडू आणि शेजारील आंध्र प्रदेश किनारपट्टी भागातील जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसू शकतो.

Rain Alert : सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत होणार गारपीट; हवामान विभागाचा अंदाज काय?

5 ऑक्टोरनंतर राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. ढगाळ वातावरण काही दिवस कायम होते. पण, पाऊस पडला नाही. ऑक्टोबर महिन्यात सर्वत्रच कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानंतर आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात तर पावसाला सुरुवातही झाली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जर अन्य जिल्ह्यात पाऊस झाला तर या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube