हिंदूंना धोका असेल तर मोदींना राज्य करण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

हिंदूंना धोका असेल तर मोदींना राज्य करण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray on Eknath Shinde : शिवसेनेच्या 57 व्या स्थापना दिनानिमित्त शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. देशात हिंदूंना धोका असेल तर मोदी सरकारला राज्य करण्याचा अधिकार नाही. ‘जो हिंदू हित की बात करेगा वही देश की बात करेगा’, असे म्हणणाऱ्यांना देशातील जनतेने सत्तेत बसवले, तरीही हिंदूंचा धोका आहे. त्यामुळे देशात हिंदू आक्रोश मोर्चे निघत आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की ते मीडियात सांगतात की, रोज कोणीतरी पक्ष सोडतो, हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. मी विचारले किती झटके देणार? मी एवढंच म्हणेन की शिवसेना हा भूकंपप्रूफ पक्ष आहे. आताचे आव्हान आपल्याच लोकांनी दिले आहेच पण एकेकाळच्या जवळच्या मित्रांने देखील दिले आहे. हे आव्हान आपण मोडणारच आहेत. हे आव्हान मोडल्यानंतर आव्हान देणारा शत्रू शिल्लक ठेवणार नाही. आपल्या आयुष्यातील हे शेवटचं आव्हान आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मंत्रिपद असतानाही विखेंचा थोरातांकडून ‘गणेश’मध्ये करेक्ट कार्यक्रम !

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थिती वाईट आहे आणि पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. मणिपूरमध्ये आज लिबियासारखी परिस्थिती आहे. राज्य जळत आहे, पण पंतप्रधानांना अमेरिकेला जायचं आहे. एका माजी लष्करी अधिकाऱ्याने ट्विट करून म्हटले आहे की, राज्याची काय स्थिती आहे, तरीही सरकार गंभीर नाही.

20 जूनला जे घडले त्याला वाघाचे काळीज लागते, एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सुनावले

पंतप्रधान मोदींनी कोविडविरोधी लस विकसित केल्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याचीही उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा व्हिडीओ दाखवत ते म्हणाले की, कोविडची लस पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तयार केल्याचे फडणवीस सांगतात. मग संशोधक काय गवत उपटत बसले होते का असा सवालही ठाकरे यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube