20 जूनला जे घडले त्याला वाघाचे काळीज लागते, एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सुनावले

20 जूनला जे घडले त्याला वाघाचे काळीज लागते, एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सुनावले

Eknath Shinde on Uddhav Thackeray : शिवसेनेच्या 57 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शक्ती प्रदर्शन करत एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्यांना कोणीतरी सांगावे की त्यांनी स्क्रिप्ट रायटर बदलावा. आमच्यावर टीका करणाऱ्यांना आम्ही आमच्या कृतीने उत्तर देतो. हा एकनाथ शिंदे शाखाप्रमुखापासून राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे. सर्व काही बाळासाहेबांच्या आशीर्वादाने झाले आहे. आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. तुमच्यावर किती गुन्हे दाखल आहेत? गेल्या वर्षी 20 जूनला जे घडले त्याला वाघाचे काळीज लागते, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, पण सत्तेसाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही गद्दारी केली आहे. तुम्हाला बाळासाहेबांच्या नावाने सहानुभूती मिळणार नाही. आमची चूक झाली असती, विश्वासघात केला असता तर 40 आमदार आमच्यासोबत आले नसते. लोक तुमच्या सोबत राहतील तोपर्यंत ठीक आहे, पण जर लोकांनी तुम्हाला सोडले तर ते कचरा बनतात. एक दिवस तुम्हीही कचरा बनून जाल, असा हल्लाबोल एकना शिंदे यांनी केला आहे.

शिंदेंनी नाही, उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केली, देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, तुम्ही केवळ नावापुरतेच मुख्यमंत्री होता. सरकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चालवत होते. मी दोन दिवसांसाठी गावी गेलो असताना मुख्यमंत्री गावाला गेल्याचे सर्वजण म्हणू लागले. तुम्ही दोन वर्षांत केवळ दोनदाच मंत्रालयात आलात. हे मी म्हणत नाही. असे शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना 2 वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीतून फक्त 2 कोटी रुपये दिले होते आणि मी 11 महिन्यांत 75 कोटी रुपयांची मदत केली होती. हे आमच्या कामाचे प्रमाण आहे.

मोदींनी कोविडची लस तयारी केली मग संशोधक काय….उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

पंतप्रधानांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मणिपूरला जाऊन दाखवावे, असे कालपासून ते सांगत आहेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राईक करून दाखवून दिले, तुम्ही फक्त मंत्रालयात गेलात, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. ते पुढं म्हणाले की, ईडीकडून नोटीस मिळाल्यावर तुम्ही लगेच सर्व काही सोडून पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला पोहोचलात. आम्हाला सर्व काही माहित आहे, परंतु मी जास्त बोलणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube