Odisha Train Accident : प्रवाशांना लागला डोळा अन् तेवढ्यात.. रेल्वे अपघाताचा थरारक व्हिडीओ

Odisha Train Accident : प्रवाशांना लागला डोळा अन् तेवढ्यात.. रेल्वे अपघाताचा थरारक व्हिडीओ

Coromandel Express Viral Video : ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेस (Coromandal Express) रेल्वेचा झालेला भीषण अपघात अजूनही कुणीच विसरले नसेल. या अपघातात हजारो प्रवाशांचे प्राण गेले. कुणाचे कुटुंबच हिरावले गेले तर कुणी एका क्षणात पोरके झाले. असा हा काळजाचा थरकाप उडविणारा अपघात होता. या भीषण अपघाताचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून अपघाताची तीव्रता किती जास्त होती याचा अंदाज येतो.

ओडिशातील बालासोर येथे 2 जून रोजी सायंकाळी रेल्वेंचा भीषण अपघात झाला. या अपघातात अडीचशे पेक्षा जास्त प्रवाशांचे प्राण गेले. तर अनेक जण जखमी झाले. अपघात कशामुळे घडला, चूक कोणाची आहे, यामागे काही घातपात तर नाही ना याचा खुलासा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला. त्यानंतर युद्धपातळीवर काम करून या मार्गावर पुन्हा रेल्वे धावू लागल्या.

व्हायरल व्हिडीओत काय?

आता या रेल्वे अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही प्रवासी झोपलेले दिसत आहेत. तर काही प्रवासी बसलेले आहेत. सफाईकर्मी साफसफाई करताना दिसत आहे. रेल्वे भरधाव वेगात आहे. तेवढ्यात अचानक एक मोठा झटका बसतो आणि रेल्वेत अंधार पसरतो. सर्वत्र आरडाओरड अन् किंकाळ्याच कानी पडू लागतात. रेल्वे रुळावरून खाली घसरल्याचाही आभास प्रवाशांना होत असल्याचे दिसते. हा व्हिडीओ अपघाताच्या काही सेकंद आधीचा असल्याचा दावा करण्यात येत आहे.

‘या’ कारणामुळे घडला अपघात 

अपघात नेमका कशामुळे घडला याचा खुलासा मंत्री वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला आहे. वैष्णव म्हणाले, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या घटनेचा तपास केला. अपघात कशामुळे घडला याचे कारण समजले आहे. या अपघातासाठी कोण जबाबदार आहेत याचीही माहिती मिळाली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलावामुळे ही दुर्घटना घडली.

ओडिशातील रेल्वे अपघाताचे कारण समजले; रेल्वे मंत्र्यांनी केला मोठा खुलासा

कवच प्रणाली नसणे हे अपघाताचे कारण नाही. हा अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्याने घडला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा अपघात कोणत्या दुसऱ्या गोष्टीमुळे झाला आहे असे म्हटलेले नाही. जबाबदार लोकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे वैष्णव यांनी सांगितले. या घटनेसाठी जबाबदार कोण आहेत हे आता समजले आहे. तपासाचा अहवालही लवकरच मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल सूचना दिल्या होत्या, असे वैष्णव म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube