Operation Silkyara : बचावकार्याने वेग धरला; मजुरांच्या सुटकेसाठी NDRF जवानांचा बोगद्यात प्रवेश

Operation Silkyara : बचावकार्याने वेग धरला; मजुरांच्या सुटकेसाठी NDRF जवानांचा बोगद्यात प्रवेश

Operation Silkyara : उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळून तब्बल 41 मजूर अडकले आहेत. या मजुरांची बोगद्यातून सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाकडून मागील 11 दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. अखेर एनडीआरएफच्या बचावकार्याने वेग धरला आहे. 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी NDRFच्या जवानांनी बोगद्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता 41 मजुरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. दरम्यान, एनडीआरएफचे जवाना बोगद्यात गेले असून घटनास्थळी जवळपास 30 रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळल्याने 41 मजूर 8 दिवसांपासून अडकले आहेत. तब्बल 192 तासांच्या प्रयत्नानंतर मजूरांसाठी अन्न पाठवण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना अन्न पाठवण्यासाठी छोटा पाईप ड्रिल करण्यात आला आहे. या घटनेला 8 दिवस झाले मात्र, अद्यापही मजुरांची सुटका झालेली नाही. बोगद्यात ड्रिल करण्यात आलेल्या या पाईपद्वारे अडकलेल्या मजुरांना खाद्यपदार्थ, फळे, अंडी, खिचडी पाठवण्यात आली आहे. सोमवारी सकाळी एनएचआयडीसीएलच्या पथकाने सहा इंची पाईप खोदण्यास सुरुवात केली. दुपारी एकच्या सुमारास समोरून दगड आल्याने ते थांबले, मात्र दुपारी 4 च्या सुमारास हा ५७ मीटरचा पाईप पुढे ढकलण्यात पथकाला यश आले.

चक्का जाम होणार! ‘पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलनाला या’ : ऊसदरासाठी राजू शेट्टी ठाम

पथकाकडून अद्यापही बचावकार्य सुरुच असून मजूरांना बाहेर काढण्यासाठी देशभरातून यंत्रसामग्री आणण्यात आली आहे. मजुरांना बाहेर काढण्यासाठी उत्तरकाशीमध्ये दिवसरात्र ड्रिलिंगचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत 45 मीटरपर्यंत ड्रिलिंगचं काम पथकाने पूर्ण केलं. ड्रिलिंगच काम पूर्ण झाल्यानंतर आता जवानांनी बोगद्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता बोगद्यात अडकलेले 41 मजूर बुधवारी रात्री उशिरा किंवा गुरुवारी सकाळी बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

National Herald Case : गांधी कुटुंबाला अडचणीत आणणारं नॅशनल हेराल्ड प्रकरण काय?

बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांच्या सुरक्षिततेसाठी व्यापाऱ्यांनी जवळच्या हनुमान मंदिरात प्रार्थना केली. सर्व यंत्रणांशी समन्वय साधून स्कॅब बोगदा बांधण्यात जवळपास यशाकडे वाटचाल केल्याने व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. गुरुवारी सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढले जाईल, अशी अपेक्षा आहे.

तब्बल 11 दिवस उलटूनही मजुरांची अद्यापही सुटका होत नसल्याने नातेवाईकांकडून आक्रोश करण्यात येत आहे. जसेजसे जास्त दिवस उलटत आहेत. तसतसं मजुरांचं मनोधैर्य खचत असून आमची लवकर सुटका करा, अशी मजुरांकडून मागणी करण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube