जितेंद्र आव्हाड यांच्याकडून तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच अभिनंदन; कारण जाणून घ्या

  • Written By: Published:
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच अभिनंदन; कारण जाणून घ्या

तमिळनाडूच्या राज्यपालांनी विधानसभेच्या अभिभाषणात महापुरुषाच्या गौरवाचा परिच्छेद वाचला नाही, त्यावर मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी जागच्या जागी उभे राहून निषेध केला. त्याचा राग येवून राज्यपाल अधिवेशनातून निघून गेले. महापुरुषांचा अपमान झाल्याने मुख्यमंत्रांनी राज्यपालांना एकदाही थांबवल नाही.

स्टॅलिन यांच्या या कृतीबद्दल त्यांना माझा सलाम एस म्हणतं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन अभिनंदन केले आहे. कालपासून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील वादामुळे तमिळनाडूमधील राजकारण तापले आहे.

 

नक्की काय घडलं तमिळनाडू विधानसभेत ?

घटनेनुसार विधानसभेच्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होत असते. पण राज्यपाल हे लिखित अभिभाषण वाचून दाखवत असतात. त्याची प्रत विधानसभेच्या सदस्यांना वाटली जाते. याशिवाय सभागृहाच्या कामकाजातही त्याचा समावेश होतो.

तमिळनाडूच्या राज्यपालांनी त्यांना दिलेल्या लेखी भाषणाचा काही भाग जाणूनबुजून सोडल्याचा आरोप आहे. ते भाषण वाचत असताना गोंधळ सुरू झाला.  विधानसभा सदस्यांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या सगळ्या गदारोळात राज्यपाल न थांबता भाषण वाचत राहिले.

राज्यपाल आर एन रवी यांचे भाषण संपल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. आर एन रवी यांनी वाचलेले भाषण सभागृहाच्या कामकाजात नोंदवले जाणार नाही, असा प्रस्ताव होता. तर जे भाषण लिहिले होते ते सभागृहाच्या कामकाजात नोंदवले जाईल. याच दरम्यान आर.एन.रवी घरातून निघून गेले आणि त्यानंतर हे प्रकरण अधिकच तापले.

राज्यपालांनी कोणता भाग वाचला नाही ?

राज्यपालांनी तामिळनाडूच्या काही व्यक्ती आणि द्रविडीयन मॉडेल ऑफ गव्हर्नन्सचा संदर्भ असलेला परिच्छेद वगळल्याचा आरोप आहे. सभापती एम अप्पावू यांनी राज्यपालांच्या भाषणाचा तमिळ अनुवाद वाचून दाखवला.

त्यात त्यांनी पेरियार, आंबेडकर, कामराजर, पेरारिग्नार अण्णा, करुणानिधी आणि मुथामिझा अरिग्नार कलैगनर यांचा उल्लेख केलेला परिच्छेद वाचला. याच परिच्छेदात द्रविडीय शासनाच्या मॉडेलचे कौतुक केले होते. त्यात धर्मनिरपेक्षतेचा संदर्भ होता. तामिळनाडूचे वर्णन शांततेचे आश्रयस्थान असे करण्यात आले. राज्यपाल आरएन रवी यांनी मुद्दाम हा परिच्छेद वाचला नाही, असा आरोप आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube