Ashish Shelar: देव, देश, धर्माच्या संघर्षातून गायब राऊत काँग्रेसच्या युवराजांसोबत चालायला गेले!

  • Written By: Published:
Ashish Shelar & Sanjay Raut

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे आज जम्मू येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

देव, देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले खासदार संजय राऊत, काँग्रेसच्या युवराजांबरोबर चालायला गेले आहेत, याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले, पक्षाची चेहरे उडाली. या कामाचा झेंडा तुम्ही घेऊन निघालाच आहात, तर तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची!” असे आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

“हिंदुत्वासाठी राम जन्मभूमी लढा जेव्हा लाखो कारसेवक लढत होते, तेव्हा संजय राऊत हे काय प्रभादेवीच्या गल्लीत बसून होते का? 370 कलम मुक्त काश्मीर व्हावे, यासाठी असंख्य जण संघर्ष करत होते, बलिदान देत होते, तेव्हा संजय राऊत मुंबईत बसून मीडियाबरोबर बसून ‘ध्वनी प्रदूषण’ करत होते. अशी आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र केले आहे.

 

Tags

follow us