Live Blog | शिंदे विरुद्ध ठाकरे : आजचा युक्तिवाद संपला, उद्या पुन्हा सुनावणी होणार
महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) होत आहे. 10 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी 14 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. त्यावर काल दिवसभर सुनावणी झाली.
काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. आज शिंदे गटाकडून वकील हरीश साळवे युक्तिवाद करणार आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
सरन्यायाधीशांनी तुषार मेहता यांना खडसावले
राज्यपालांनी राजकीय मत व्यक्त करू नये.
सरन्यायाधीशांनी तुषार मेहता यांना खडसावले
-
राज्यपाल हा युक्तिवाद कसा मांडू शकतात ?
शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतची आघाडीही निवडणूकीनंतर झालेली आहे.
त्यावर सरन्यायाधीशांनी तुषार मेहता यांना खडसावले
राज्यपालांनी या मुद्दयांवर बोलू नये, सरन्यायाधीशांनी खडसावले
-
तुषार मेहता बाजू मांडत आहे
सॉलीसिटीर जनरल तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडत आहेत
-
कोर्टाचं कामकाज काही वेळासाठी स्थगित
कोर्टाचं कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं आहे.
न्यायमूर्तींना काही चर्चा करण्यासाठी निर्णय
-
नवाब राबिया प्रकरणाची प्रक्रिया लक्षात घ्या
नवाब राबिया प्रकरणाची प्रक्रिया लक्षात घ्या. नीरज कौल यांचा युक्तिवाद
-
प्रकरण मोठ्या बेंचकडे जाणार ?
प्रकरण मोठ्या बेंचकडे देण्याची गरज आहे का ? असा प्रश्न न्यायमूर्तीनी विचारला आहे.
-
अविश्वास प्रस्तावानंतर अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही - कौल
ब्रेकनंतर शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्या युक्तीवादाला सुरूवात
अविश्वास प्रस्तावानंतर अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही - कौल यांचा युक्तिवाद
-
हरीश साळवे यांनी काय मुद्दे मांडले ?
Shinde Vs Thackeray : शिंदे गटाकडून साळवे यांनी काय युक्तिवाद केला?
-
प्रकरण ७ जजेस बेंचकडे पाठवण्याची गरज नाही
ठाकरे गटाकडून प्रकरण ७ जजेस बेंचकडे पाठवण्याची मागणी केली होती.
हे प्रकरण ७ जजेस बेंचकडे पाठवण्याची गरज नाही. ५ बेंच जजेसकडेच सुनावणी व्हावी.
शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा दावा
-
नबाम रेबिया प्रकरण योग्य की अयोग्य हे राजकीय स्थितीवर ठरतं - सर्वोच्च न्यायालय
ठाकरे शिंदे वादाच्या सुरुवातीपासून नबाम रेबिया केसचा उल्लेख केला जात आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने टिपण्णी केली आहे.
नबाम रेबिया प्रकरण योग्य की अयोग्य हे राजकीय स्थितीवर ठरतं, अशी टीप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली.
-
आम्हीच खरी शिवसेना - शिंदे गटाचे नीरज कौल यांचा दावा
पक्षांतर्गत वाद हा लोकशाहीचा भाग आहे. पक्षाच्या नेत्याला हटवण्यासाठी हा संघर्ष आहे.
आम्हीच (शिंदे गट) शिवसेना आहोत, आमच्याकडे बहुमत आहे.
शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा दावा
-
पक्षांतर्गत नाराजीचा विचार व्हायला हवा.
शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांची नाराज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर होती.
त्यामुळे अशा पक्षांतर्गत नाराजीचा विचार व्हायला हवा.
शिंदे गटाचे नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद
-
हरीश साळवे यांचा युक्तिवाद संपला
हरीश साळवे यांचा युक्तिवाद संपला आहे. साळवे यांच्यानंतर शिंदे गटाचे दुसरे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद सुरु
-
पक्षांतर बंदी विरोधी कायदा विश्वास गमावलेल्या नेत्यासाठी शस्त्र बनू नये
पक्षांतर बंदी विरोधी कायदा विश्वास गमावलेल्या नेत्यासाठी शस्त्र बनू नये. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा युक्तिवाद
-
आमदार अपात्र ठरवले तेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता
आमदार अपात्र ठरवले तेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, हरीश साळवे यांचा युक्तिवाद
२७ जूनला आमदार अपात्र ठरवण्यात आले पण २२ जूनला याचिका दाखल करण्यात आली होती.
२८ जूनला बहुमत चाचणी आहे, ठाकरेंना सांगितलं होतं. ठाकरेंनी बहुमत चाचणी आधीच आपला राजीनामा दिला.
-
महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार
महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, शिंदे गटाचे वकील हरिश साळवेंचा दावा.
एकनाथ शिंदे यांना बहुसंख्य आमदारांनी पाठींबा दिला.त्यामुळे उद्धव ठाकरेंना वाटलं की त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळेच सरकार कोसळले
-
उपाध्यक्ष झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव असताना त्यांनी आमदारांना अपात्र ठरवलं
विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव असताना त्यांनी आमदारांना अपात्र ठरवलं - शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा युक्तिवाद
-
‘त्या १६ जणांच्या भवितव्यांवर सरकार राहणार की जाणार हे कळणार’ ?
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सध्या न्यायालयीन लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) घटनापीठासमोर याची सुनावणी सुरू असून, न्यायालयाचा निकाल काय राहणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी दावा केला. उल्हास बापट यांनी काही महत्त्वाचं मुद्दे उपस्थित करत दावा केला.
सविस्तर वाचा
‘त्या १६ जणांच्या भवितव्यांवर सरकार राहणार की जाणार हे कळणार’ ? Ulhas Bapat यांचा दावा
-
हरीश साळवे यांचा युक्तीवाद सुरु
सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा युक्तीवाद सुरु
पक्षांतरबंदी कायदा यावर बोलण्यास सुरुवात
-
शिंदे गटाची बाजू कोण मांडणार ?
ठाकरे गटाकडून काल कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामतांनी बाजू मांडली.
आज शिंदे गटाची बाजू हरिश साळवे, नीरज कौल, मनिंदर सिंग बाजू मांडणार आहेत.
-
‘नबाम रेबिया’ केस काय आहे? ज्याचा काल उल्लेख केला गेला?
शिंदे गटाच्या वतीने न्यायालयासमोर 2019 साली घडलेल्या नबाम रेबिया ( Nabam Rebiya ) केसचा दाखला दिला जात आहे. या केसचा निकाल हा ठाकरे गटाची चिंता वाढवणार आहे.
काय आहे नबाम रेबिया केस? सविस्तर वाचा
Nabam Rebiya : ठाकरेंची चिंता वाढवणारी काय आहे ‘नबाम रेबिया’ केस
-
ठाकरे गटाकडून काय युक्तिवाद केला गेला?
Thackeray Vs Shinde : पक्षांतरबंदी कायदा, अध्यक्षपद, नबाम रेबिया, ठाकरे गटाने काय युक्तिवाद केला?