“येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय? तुझी नियत..” जरांगेंचा भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल

“येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय? तुझी नियत..” जरांगेंचा भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर घणाघाती टीका केली. येवल्यावाला म्हणतो की आम्ही ६० टक्के आहे. तू काय आम्हाला बधीर समजतो का. त्यानंतर म्हणतो एसटी भरलेली आहे. मी म्हटलं मला दार तर उघडू दे. त्या एसटीत तू एकटाच तंगड्या लांबून बसलाय तुला तंगडीसकट बाहेर ओढतो अशा शब्दांत भुजबळांचा समाचार घेतला. जरांगे पाटील यांनी एका सभेत बोलताना भुजबळांवर निशाणा साधला.

जरांगे पुढे म्हणाले, ४ जूनला सगळ्यांनी अंतरवली सराटीत यायचं आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी द्यायची नाही. मराठा समाजाला आता करोडोंच्या संख्येत एक व्हायला हवे. मॅनेज होत नाही हे लक्षात आल्यानंतर सरकारकडून डाव रचला जात आहे. आता कोणत्या जातीचे लोक मराठ्यांना त्रास देता तेच बघू या, असा इशारा जरांगे पाटील यांनी या सभेतून दिला.

मराठे जातीयवादी असते तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले असते का? मनोज जरांगे

छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर जरांगेंनी जोरदार टीका केली. तुझी नियत चांगली नाही. तुला तर फक्त खाण्याची सवय लागली आहे. ओबीसी महामंडळ ८० टक्के खाऊन टाकलं. त्याचाच सर्वात जास्त मराठा आरक्षणाला विरोध आहे. वंजारी आणि धनगर बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही तरीही तुम्ही त्यांना सभेला बोलावता, असा सवाल जरांगेंनी यावेळी उपस्थित केला.

ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागितले तर दंगली होतील असे काहीजण मला म्हणत होते. पण, लढाई यशस्वी व्हायला लागली की हे लोक भीती दाखवतात. जुन्या नोंदी सापडल्या आहेत. तोच सर्वात मोठा पुरावा आहे. त्यामुळे आता सगळ्यात अस्सल ओबीसी कोण असेल तर तो मराठा आहे. कारण त्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

आमदारांची वाढणार धाकधुक, मनोज जरांगे यांची मोठी घोषणा, सर्व 288 जागांवर उमेदवार देणार

मला अटक करण्यासाठी सरकारने कट रचला. माझ्या विरुद्ध एसआयटी चौकशी समिती नेमली. आता ते मला तुरुंगात टाकतील. माझ्या विरुद्ध रोज दोन किंवा तीन गुन्हे दाखल केले जातील. मला तडीपार करण्याचा त्यांचा उद्देश दिसतोय. तडीपार करून दुसऱ्या राज्यात गेलो तरी या राज्यातील मराठे त्या राज्यात बोलावून मोर्चे काढू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज