Sanjay Raut : भीती अन् निराशेपोटी मोदी महाराष्ट्रात; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : भीती अन् निराशेपोटी मोदी महाराष्ट्रात; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्रात येत आहेत. आज दुपारी साईनगरी शिर्डीत मोदींचे आगमन होणार आहे. येथे मोदी विविध विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत. तसेच शेतकरी मेळाव्यालाही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींच्या या दौऱ्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. पीएम मोदी वारंवार महाराष्ट्र आणि मुंबईचे दौरे का करत आहेत, या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी दिले आहे.

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. तसेच पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत का महाराष्ट्रात ते आधी पहावं लागेल. मोदी येताहेत विकासकामांचं उद्घाटन करणार हे मी तुमच्याकडूनच ऐकतोय. याचा अर्थ राज्यात निवडणुका होणार आहेत. सरकार बदलणार आहे की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार यातील काहीही घडू शकतं. मोदी येताहेत ते आता साईबाबांचे दर्शन घेतील, भाषण करतील. ते स्वतःच एक मोठे बाबा आहेत. त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळतील. पाहू या काय होतंय. पण, महाराष्ट्राला काय मिळणार. काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पळत दिल्लीला गेले. महाराष्ट्राची इतकी अस्थिर अवस्था याआधी कधीच झाली नव्हती.

PM Modi यांच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या बसच्या काचा फोडल्या; ‘या’ ठिकाणची घटना

भाजपातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक भाषणमाफिया 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. राज्य सरकार अद्याप यावर काहीच तोडगा काढू शकलेलं नाही. आता मोदीच यावर तोडगा काढू शकतात. केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतं. मनोज जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर बसवावं आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा असे आम्ही आधीच म्हणालो होतो पण, तसे काही घडत नाही. आता मोदी भाषण देऊन निघून जातील. भारतीय जनता पार्टीतील अर्ध्यापेक्षा जास्त लोक भाषणमाफिया आहेत.

राज्यातील नेते भ्रष्ट आणि अकार्यक्षम

पंतप्रधान मोदी वारंवार महाराष्ट्र, मुंबईचा दौरा का करत आहेत कारण, त्यांना महाराष्ट्रात आम्ही हरत आहोत. भाजप आणि त्यांचं जे काही जुगाड केलं आहे ते निवडणुकीत हरणार आहे. त्यामुळे एका भीतीतून एका निराशेतून हे दौरे सुरू आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर काही बंधनं नाहीत. पण, राज्यातील भाजप नेते त्यांना वारंवार येथे बोलावत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज्याचं नेतृत्व अकार्यक्षम आणि भ्रष्ट असल्यामुळं पंतप्रधानांना इथं वारंवार बोलवावं लागत आहे.

Maratha Reservation : गाड्या फोडल्यानंतर सदावर्तेंची संतप्त प्रतिक्रिया म्हणाले, ते माझ्या मुलीला आणि पत्नीला…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज