‘अफजल खान, होते म्हणून…शिवाजी महाराज, जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

‘अफजल खान, होते म्हणून…शिवाजी महाराज, जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

पुणे : अफजल खान आहेत, म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आहेत ना ! तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलंय. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मुस्लिम वस्त्यात जाऊन बघा, किती उत्साहाचे वातावरण असते. मुस्लिम वस्तीत उत्साह असतो. त्यांच्या मनात भीती राहते अस्तित्वाची. त्यांना सिद्ध करावं लागतं की, ते भारतीय आहेत, किती वर्ष त्यांच्याकडे पुरावा मागणार आहात ?, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.

त्यांनी पुरावा दिला तर, जिना यांनी पाकिस्तान काढला आणि यांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानात नाही येणार हा आमचा देश आहे. त्यांना कसले कागदी पुरावे मागत आहात ? त्यांनी पुरावा दिला असल्याचे, जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात वृत्तपत्रावर बंदी येत आहे. टीव्ही चॅनल विकत घेतली जात आहेत. खऱ्या बातम्या तुमच्यापर्यंत येतच नाहीत. भारत जोडो यात्रेच कवरेज दिलं नाही, पण सोशल मीडियाने या मिडियाची वाट लावली”, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

हे व्यासपीठ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालं. शिव-शाहू-फुले-आंबेडकर हे सूत्र उद्ध्वस्त करण्याचं काम काही लोक करत असतात. हा सगळा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचे मत त्यांनी मांडलं. अजित पवार छत्रपती संभाजी राजेंना काय म्हणाले ? यावर महाराष्ट्र पेटला आणि मग आम्हाला सांगावं लागलं की दादोजी कोंडदेव महाराजांचा गुरू नव्हता, असा दावा त्यांनी यावेळी केला. फ्रांसिस मार्टिन याने देखील संभाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काहीतरी लिहून ठेवलंय. मला नवा वाद उकरून काढायचा नाही, म्हणून इथेच थांबतो. पण संभाजी महाराजांना कुणी मारले ?, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

स्वतःच्या घरात जर गद्दारी झाली, तर काय करणार माणूस ? संभाजी महाराज यांना समजायला लागलं तसं शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील लोकांची डोकी वर यायला लागली. संभाजी महाराज आणि अष्टमंडळ यांच्यात गैरसमज सुरु झाले, असं यावेळी आव्हाडांनी सांगितलं. कुठल्याही इतिहासकाराला शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे कारण आतापर्यंत सांगता आले नाही. मोरोपंत पिंगळे यांच्या जागेवर संभाजी महाराज यांनी विवोपंत यांना पद दिलं, पुढे म्हणाले औरंगजेब आणि राजपूत यांच्यात भांडणं व्हायला लागली. संभाजी महाराज आग्राला होते, तेव्हा अकबर आणि संभाजी यांची भेट झाली. अकबरला वाटले संभाजी महाराज मला औरंगजेबपासून वाचवतील, असं आव्हाडांनी यावेळी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube