PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द झाला तर फायनलमध्ये भारताशी कोण भिडणार?

PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द झाला तर फायनलमध्ये भारताशी कोण भिडणार?

Pakistan vs Sri Lanka: आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका संघ उद्या (14 सप्टेंबर) फायनलच्या तिकीटासाठी भिडतील. दोन्ही संघांचा सुपर-4 मधील हा शेवटचा सामना असला तरी दोन्ही संघासाठी ही सेमीफायनल असणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी सुपर-4 मध्ये प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. या कालावधीत दोघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकणारा संघ चार गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश करेल.

पाकिस्तान आणि श्रीलंका सामना रद्द झाला तर?
या सामन्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा सामना पावसामुळे रद्द झाला तर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम फेरीत कोण पोहोचणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. उत्तर आहे श्रीलंका. वास्तविक, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर दासून शनाकाचा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. श्रीलंकेचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा खूपच चांगला आहे. अशा स्थितीत सामना रद्द झाल्यास श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

‘इंडिया’ची पहिली सभा ठरली! भोपाळमध्ये ‘इंडिया’ आघाडीची जाहीर सभा…

राखीव दिवस ठेवण्यात आला नाही
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ उद्याच कळेल. पावसामुळे सामना रद्द झाल्यास श्रीलंकेचा संघ 17 सप्टेंबरला भारताविरुद्ध अंतिम सामना खेळेल.

Asian Games 2023: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जखमी, उमरान मलिक घेणार जागा

टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला
भारतीय संघाने यापूर्वीच सुपर-4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, 15 सप्टेंबरला टीम इंडिया सुपर-4 चा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ अंतिम सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यातील विजेत्या संघाशी भिडणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube