- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
पुण्यात भीषण अपघात ! ट्रकला आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू
पुणेः पुणे शहरात (Pune City) अपघाताची मालिका सुरूच आहे. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारासही पुणे शहरात एक भीषण अपघात झाला आहे. कंटेनरला धडक दिल्याने ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात एका लहानग्याचा समावेश आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिराजवळ हा अपघात झाला आहे. […]
-
तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो; येरवडा जमीनप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांचे कानावर हात
मुंबईः पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना अडचणीत आणले आहे. येरवडा येथील पोलिस खात्याची जमीन विक्री करण्यासाठी पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री दबाव आणल्याचा आरोप बोरवणकर यांचा आहे. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते, असा मुद्दा आता समोर येऊ लागला होता. येरवडा जमिनीच्या प्रकरणाच्या वेळी मी मुख्यमंत्री नव्हतो. मी […]
-
भविष्यात शिवसेना गर्व से कहो MIM हैं बोलेले; आता भाजप-ठाकरे गटामध्ये जोरदार जुंपली
Sushma Andhare On Ashish shelar : राज्यातील समाजवादी जनता परिवारातील संघटनांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यावरून आता ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपमधील नेत्यांनी डिवचण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात शिवसेना गर्व से कहो MIM हैं बोलेल, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. त्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या […]
-
नगर-आष्टी रेल्वेला लागलेली आग आता संशयाच्या भोवऱ्यात, थेट रेल्वे मंत्र्यांकडेच तक्रार
Nagar-Ashti Railway: नगर-आष्टी रेल्वे सेवा (Nagar-Ashti Railway) अनेक वर्षानंतर सुरू झाली. या रेल्वेला प्रवासांचा अल्प प्रतिसाद होता. केवळ सात ते आठ व्यक्तीच या रेल्वेने प्रवास करत होते. सोमवारी दुपारी न्यू आष्टी (New Ashti)रेल्वे स्थानकाकडून रेल्वेगाडी नगरकडे येत होते. नगर तालुक्यातील शिराढोण येथे रेल्वेच्या पाच डब्यांना (बोगींना) भीषण आग लागली. गाडीत दहाज-बारा प्रवासी होते. ते सुरक्षितपणे […]
-
धनगर समाजाला कधी मिळणार आरक्षण ? पडळकरांनी सांगितली डेडलाईन
इंदापूर : सध्याचे सरकार धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पूर्णपणे सकारात्मक असून डिसेंबर महिन्याच्या अखेरीस धनगर समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी व्यक्त केला. पडळकरांनी सध्या धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) महाराष्ट्रभर धनगर जागर यात्रेचे आयोजन केले असून इंदापूर येथे धनगर जागर यात्रेच्या सभेत ते बोलत होते. उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीच्या अंतिम […]
-
कंत्राटी भरतीमुळे कायदा-सुव्यवस्था कशी राहील ? शरद पवारांचा सरकारला सवाल
मुंबई : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. गृहखाते मी सांभाळले आहे. पोलिसांची (Police) ड्युटी महत्त्वाची आहे. कंत्राटी पोलिस घेतल्यानंतर अकरा महिन्यात सगळ्या गोष्टी होत नाही. कंत्राटी भरतीमुळे कायदा-सुव्यवस्था कशी राहील, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय. कंत्राटी पद्धतीने […]
-
Earthquake in Delhi-NCR : दिल्लीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के !
दिल्ली-एनसीआर भागात रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. दोन आठवड्यात दुसऱ्यांदा असे धक्के बसले आहेत. दिल्ली, गाजियाबाद, नोएडा भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपामूळे काही भागात जास्त हादरले नागरिकांना जाणवले आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. नागरिक हे घरे सोडून मोकळ्या जागेत आल्याचे वृत्त आहे. यापूर्वी तीन ऑक्टोबरलाही दिल्ली, एनसीआरसह उत्तर भारतातील काही राज्यात भूकंपाचे धक्के […]
-
World Cup 2023 : पाकिस्तानला धूळ चारली अन् भारताची गुणतालिकेत मोठी झेप !
IND vs PAK : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या लढतीत भारताने (India ) पाकिस्तानवर (Pakistan) सात विकेट राखून दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयाबरोबर भारताने वर्ल्डकपमध्ये आठव्यांदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. या विजयासह गुणतालिकेतही (Point Table) भारताने मोठी झेप घेतली आहे. गुणतालिकेत […]
-
World Cup 2023 : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, रोहित शर्मा, श्रेयस अय्यरची धुव्वाधार खेळी
IND vs PAK : वर्ल्डकपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला आहे. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 191 धावांवर ऑलआऊट केले. प्रत्युत्तरात 192 धावांचे लक्ष्य भारताने 30. 3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठले आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावांची मोठी खेळी केली आहे. तर श्रेयस अय्यर नाबाद 53 धावा करत भारताला विजय मिळवून दिला […]
-
जरांगेंच्या गंभीर आरोपावर मंत्री देसाई म्हणतात; जरांगेंचा काहीतरी गैरसमज झाला असावा…
मुंबई : छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते हे कशामुळे बोलतात माहित आहे का? यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले असा अंदाज आहे की, तुम्ही मराठ्यांना उचकावा म्हणजे मराठे रागीट आहेत, ते काही तरी करतील आणि त्या नावाखाली आपण मराठ्यांना आरक्षण देणार नाही असा डाव आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी […]









