Bharat Jadhav: “हे शहर आता…,” भरत जाधवने थेटच सांगितले मुंबई सोडण्यामागचं खरं कारण…

Bharat Jadhav: “हे शहर आता…,” भरत जाधवने थेटच सांगितले मुंबई सोडण्यामागचं खरं कारण…

Bharat Jadhav: रंगभूमी असो वा मालिका किंवा चित्रपट, तीनही क्षेत्रात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणून भरत जाधव (Bharat Jadhav) ) यांचं नाव घेतलं जातं. मराठी अभिनेता भरत जाधवने अनेक मराठी सिनेमामध्ये भूमिका साकारून चाहत्यांची नेहमी मनं जिकंत असल्याचे दिसून येत असतो. (Marathi Movie) गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याने मुंबई (Mumbai) सोडली आणि तो संपूर्ण कुटुंबासोबत आता कोल्हापुरात (Kolhapur) राहत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)


मूळचा कोल्हापूरचा असलेल्या भरतने गेल्या काही महिन्यांपूर्वी कुटुंबासह मूळ गावी जाण्याचा मोठा निर्णय हाती घेतला होता. त्याच्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्याने असा निर्णय का घेतला? आणि त्याने राहण्यासाठी कोल्हापूर शहरच का निवडलं? याबद्दल त्याने मोठा खुलासा यावेळी केला आहे. मुंबई सोडून कोल्हापुरला जाण्याविषयी भरत जाधव म्हणाला की, ‘मुंबई हे शहर बिझनेस हब झाले आहे, असं मला या शहराबद्दल वाटत आहे.

मी असा विचार करत आहे की, कारण मला आता सगळ्या गोष्टींपासून कायमची सुटका हवी आहे.आता माझ्याकडे कोल्हापुरात एक घर आहे आणि माझे आई-वडील देखील माझ्यासोबत राहत आहेत. काम असेल तेव्हा मी इथे मुंबईला येत असतो. मी माझा मुंबईचा फ्लॅट विकला नाही. शूटिंग किंवा काम असेल तेव्हा मी या ठिकाणी येतो आणि परत कोल्हापूरला निघून जात असतो. या निर्णयाबद्दल पुढे भरत म्हणाला आहे.

सेक्रेड गेम्स 2 मध्ये इंटिमेट सीन शूट करताना मासिक पाळीच्या… अमृता सुभाषने सांगितला अनुभव

तसेच आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी थोडं थांबणं, वेळ घेणं आवश्यक असत, असं मला वाटतं. यामुळे मी आणि माझ्या कुटुंबाने कोल्हापुरामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. मला तिथे खूप छान वाटतं, तिथे असलेली ताजी हवा. मला मुंबई खूप आवडते. पण तिथून काम करणं गरजेचं राहिले नाही. आता मी कोल्हापूर येथून मुंबईला काम करण्यासाठी येत असतो, माझं काम झालं की परत कोल्हापूरला निघत असतो. असे यावेळी भरत जाधवने सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube