Samantha Ruth Prabhu: अभिनेत्रीचा चित्रपटसृष्टीला रामराम! नेमकं काय आहे प्रकरण? 

Samantha Ruth Prabhu: अभिनेत्रीचा चित्रपटसृष्टीला रामराम! नेमकं काय आहे प्रकरण? 

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला (Samantha Ruth Prabhu) ‘पुष्पा’ (Pushpa) या सिनेमातील मधील गाण्यामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. समंथाने अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केले आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून तिचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) फ्लॉप ठरताना असल्याचे दिसून येत आहेत. आता सिनेमा फ्लॉप ठरल्यावर समंथाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)


ती अभिनय क्षेत्राला आता कायमचा राम राम घेतला आहे. समंथा ही गेल्या काही महिन्यांपासून तिच्या आरोग्याच्या संबंधित काही समस्यांचा मोठा सामना करत असल्याचे यावेळी तिने सांगितले आहे. तरीदेखील समंथा ही काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार समंथा आता अभिनय क्षेत्राला जवळपास एक वर्षाचा राम राम ठोकणार आहे. या ब्रेकमध्ये ती तिच्या आरोग्याची विशेष काळजी घेणार आहे. यासोबतच मायोसिटिसवर देखील उपचार घेणार असल्याचे यावेळी तिने सांगितले आहे.

सिटाडेल आणि खुशी या सिनेमानंतर समंथाचा कोणताही नवीन बॉलिवूड किंवा साऊथ सिनेमा साइन करण्याचा कोणताही विचार नसल्याचे यावेळी तिने सांगितले आहे. खुशी सिनेमानंतर ज्या प्रोजेक्ट्सवर ती काम करणार होती, त्या प्रोजेक्ट्सच्या प्रोड्युसरने दिलेले अॅडव्हान्स पेमेंट देखील तिने परत केल्याचे सांगितले आहे. समंथानं सर्बियामध्ये वरुण धवनबरोबर सिटाडेल इंडियाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यानंतर समंथा सध्या विजय देवरकोंडाबरोबर ‘खुशी’ या सिनेमाचे शूटिंग करत आहे. या सिनेमाचे शूटिंग २-३ दिवसांत पूर्ण झाल्यानंतर समंथा ही तिच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देणार आहे. ती अभिनयक्षेत्रातून एक वर्षासाठी राम राम ठोकणार असल्याचे यावेळी तिने सांगितले आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

समंथा गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आली आहे. ‘ये माया चेसावे’ या तेलगू सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान समंथा आणि अभिनेता नागा चैतन्यची भेट झाली. त्यानंतर ‘ऑटोनगर सूर्या’ या सिनेमाच्या सेटवर ते पुन्हा एकत्र दिसून आले होते. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. समंथा ही सोशल मीडियावर तिच्या आगामी प्रोजोक्ट्सची माहिती देत असते. समंथाच्या सोशल मीडियावर देखील एक पोस्ट चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधत असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube