मुंबईतील आणखी एक सरकारी कार्यालय दिल्लीला; हा महाराष्ट्र द्रोह नाही का? काँग्रेसचा भाजपाला सवाल

  • Written By: Published:
मुंबईतील आणखी एक सरकारी कार्यालय दिल्लीला; हा महाराष्ट्र द्रोह नाही का? काँग्रेसचा भाजपाला सवाल

महाराष्ट्राबद्दलचा पूर्वापार असलेला आकस मोदी सरकार आल्यापासून कृतीत उतरल्याचं म्हणत मुंबईतील वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्लीला हलवल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत (sachin sawant congress) यांनी केला आहे. सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये केंद्र सरकारकडून वस्त्र आयुक्त रूप राशी यांना लिहिलेलं पत्र जोडलं आहे. या पत्रात वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात येत असल्याचा उल्लेख आहे.

‘लव्ह जिहादचा’ वाद पेटणार?; पत्रकार परिषदेत व्हिडिओ सादर करत नितेश राणेंचे खळबळजनक खुलासे

काय म्हणाले सचिन सावंत?

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्राबद्दलचा पूर्वापार असलेला आकस मोदी सरकार आल्यापासून कृतीत उतरला आहे. IFSCसहित अनेक महत्त्वाचे उद्योग/ प्रकल्प, राष्ट्रीय संस्थांची महत्त्वाची कार्यालये गुजरात वा इतरत्र नेण्यात आली. आता १९४३ पासून मुंबईत असणारे वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्लीला हलवण्यात येत आहे. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असताना महाराष्ट्रातील भाजपा नेते केंद्राला मदत करतात. हा महाराष्ट्र द्रोह नाही का? महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन आहे. महाराष्ट्राला मागे सारणे हा १२ कोटी मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहेच पण देशासाठीही घातक आहे.”

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेकमोठे उद्योग आणि प्रकल्प गुजरात आणि अन्य राज्यांमध्ये गेल्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकार विरोधात रान उठवले होते. यानंतर आता आणखी एका मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने मुंबईतील टेक्स्टाईल आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने वस्त्रोद्योग आयुक्तांना तसे निर्देश दिले आहेत. हाच धागा पकडत मोदी सरकारकडून मुंबई आणि महाराष्ट्राचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी सुरु केला आहे.

पंकजा मुंडेंना थेट पंतप्रधान व्हायचयं?; परळीतील विधानानं चर्चांना उधाण

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube