सावधान… नव्या व्हायरसने घेतला राज्यातील दोघांचा बळी

सावधान… नव्या व्हायरसने घेतला राज्यातील दोघांचा बळी

मुंबई : गेल्या काही वर्षांपूर्वी कोरोना नावाच्या व्हायरसमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीने लॉकडाऊन देखील करावे लागले होते. मात्र हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला व परिस्थिती पुर्वव्रत होते तोच नव्या व्हायरसने देशात एंट्री केली आहे. H3N2 नामक या व्हायरसची राज्यात एंट्री झाली असून नुकतेच या व्हायरसमुळे दोघांचे प्राण गेले आहे. यामुळे आता राज्याच्या चिंतेत भर पडणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाकाळात राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली होती. कोरोनामुळे लाखो नागरिकांचे बळी गेले. गेली दोन वर्षे या व्हायरसने धुमाकूळ घातला होता. आता कुठे हे टेन्शन कमी झालं होतं तर देशात नव्या व्हायरसने प्रवेश केला. एच3एन2 असे या व्हायरसची नाव आहे. या नव्या व्हायरसने (H3N2 Virus) राज्यात आतापर्यंत दोघांचा बळी घेतला आहे. मिळालेल्या माहिती नुसार राज्यात एच3एन2 च्या 119 तर एच1एन1 च्या 324 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या रुग्णालयात 73 जणांवर उपचार सुरु आहेत.

देशासह राज्याची चिंता वाढवणाऱ्या या व्हायरसने महाराष्ट्रात दोघांचे प्राण घेतले आहे. या व्हायरसचा पहिला बळी हा अहमदनगरमध्ये ठरला होता. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये 73 वर्षाच्या वृद्धाचा याच व्हायरसने जीव घेतला आहे. H3N2 चा धोका पाहता प्रशासन अलर्टवर आहे. राज्यातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना कोविड आणि इन्फ्लूएन्झाबाबत रुग्णांचे नियमित सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बाधित रुग्णाने काय काळजी घ्यावी? जाणून घ्या
या व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रुग्णांनी मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सकस व पौष्टिक आहार घ्यावा, आराम करावा, घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, कोरोना काळात ज्याप्रकारे काळजी घेतली, त्याप्रकारे रुग्णांनी काळजी घ्यावी, असं आवाहन डॉक्टरांकडून केलं जात आहे.

जाणून घ्या या आजाराची लक्षणे
ताप येणे
त्वचा उबदार आणि ओलसर होणे
चेहरा लाल होणे
डोळे पाणावणे
सर्दी, अंगदुखी, कफ नसलेला खोकला, डोकेदुखी होणे
गर्भवती महिलांना ‘ही’ लक्षणे दिसल्यास सतर्क राहा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube