उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंनाही सोडलं नाही…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंनाही सोडलं नाही…

Devendra Fadnvis on Nana Patole : मुंबईत 26/11 रोजी घडलेला बॉम्बस्फोट नाना पटोले यांनीच केला असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीसांनीही आपल्या भाषणात त्यांच्यावर आरोपांचा पलटवार केलाय.

बाळासाहेब म्हणाले होते…काँग्रेस सोबत जायची वेळ आली तर मी शिवसेना बंद करेल

काय म्हणाले होते नाना पटोले?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग निलंबन प्रकरणामध्ये शिंदे-फडणवीस सरकारकडून कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही. सरकारने कॅटच्या आदेशाचेही पालन केलेले नसल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता.

BJP : नाशिकमध्ये तोंड पोळल्यानंतर पुण्यात भाजपनं ताकही फुंकून प्यायलं

तसेच अॅंटिलिया स्फोट प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी ठरवलेली स्क्रिप्ट वाचत असल्याचंही ते म्हणाले आहेत. त्यावेळी मी विधानसभेत असताना त्यांचं वक्तव्य रेकॉर्डवर घेतले असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

Devendra Fadnavis : एक निर्णय बैलगाडा शर्यतीसाठी ठरला वरदान; फडणवीसांनी दिलेल्या ‘त्या’ अहवालात काय होते?

तसेच उद्योजक अंबानींच्या घरासमोर स्फोटक देवेंद्र फडणवीस यांनीच ठेवले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर असताना नियोजित कार्यक्रमांमध्ये नड्डांसह फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

Sanjay Gaikwad :’एकनाथ शिॆदेच्या पैशांवर…’ राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवर शिंदे गटाचा धक्कादायक खुलासा

यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे गटावर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालंय. फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरुन देखील ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. राजाचा आवडता पोपट मेला हे कोणी सांगायला तयार होत नाही.

तसेच उद्धव ठाकरेंना पोपट मेला हे कोणी सांगायला तयार होत नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गटाने जी याचिका केली होती. त्यामध्ये एकुण 8 मागण्या होत्या. 8 पैकी त्यांची एकही मागणी मान्य केली नाही, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना सुनावले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube