Dhangar Reservation : ‘धनगर आरक्षणाचा प्रश्न चर्चेने सोडवणार’; भंडारा उधळल्यानंतर विखे पाटलांनी केलं स्पष्ट

Dhangar Reservation : ‘धनगर आरक्षणाचा प्रश्न चर्चेने सोडवणार’; भंडारा उधळल्यानंतर विखे पाटलांनी केलं स्पष्ट

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाचा प्रश्न चर्चा करुन सोडवणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी(Radhakrushna Vikhe Patil) स्पष्ट केलं आहे. मंत्री विखे पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर असून याचं दौऱ्यादरम्यान, धनगर आरक्षण आंदोलकाने त्यांच्यावर निवेदन सादर करुन भंडाऱ्याची उधळण केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याचदरम्यान बोलताना हा प्रश्न आपण चर्चा करुन सोडवणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

राजस्थानमध्ये वाढली शिंदेंची ताकद; ‘लाल डायरीवरुन’ गेहलोत सरकारला अडचणी आणलेला नेता शिवसेनेत

पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, माझ्यावर पवित्र भंडाऱ्याची उधळण केल्याचा मला आनंदच झाला, तेव्हा भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको. आरक्षण हा विषय संवेदनशील असून प्रश्न चर्चेने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. धनगर आरक्षणासंदर्भातील भावनांबद्दल सरकार संवेदनशील असल्याचंही मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Jawan Box Office Collection: किंग खानच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रचला इतिहास; कमावले ‘इतके’ कोटी

तसेच राज्यातील कोणत्याही समाजाच्या मागण्यांबाबत आम्ही सरकारमधून नेहमीच सकारात्मक विचार करतो, याही पुढे जाऊन सांगतो आपल्या मागण्यांसाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळासमोर जाऊन आपल्या समस्या, आपला आवाज तिथे प्राधान्याने मांडेन. प्रश्न कोणताही असो तो चर्चेने आणि संवादाने सोडवता येतो, यावर माझा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुधारित जीआर घेऊन या, तुमच्याच हाताने पाणी पितो : CM शिंदेंच्या ‘अर्जुनाला’ जरांगेची उलट ऑफर

माझा मतदार संघ असो, मंत्रालय असो की पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्हा असो, त्या त्या ठिकाणी येऊन भेटणाऱ्या सर्वसामान्य जनतेला वेळ देऊन त्यांची भेट घेतो. त्यांच्या समस्या समजावून घेत असतो. त्यावर प्राधान्याने उपाययोजना करणे, समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मी प्रयत्नशील राहतो.आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथेही मी तसेच धनगर आरक्षणासंदर्भातील कृती समितीच्या सदस्यांना वेळ दिली, त्यांचे निवेदन घेत त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधला. मात्र, अनपेक्षितपणे जो काही अनुचित प्रकार झाला, यामुळे एकप्रकारे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये, एवढी भूमिका माझी आहे.

भंडारा उधळणे ही कृती चुकीची नाही, कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे, पण पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण केल्याचा मला आनंदच झाला. त्यामुळेच भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, गुन्हे दाखल करू नयेत, असे आदेश मी दिल्याचे असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय प्रलंबित असला तरी सरकारने त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य केले आहे.पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून मेंढी शेळी सहकार विकास महामंडळ स्थापन करून अर्थसहाय्य करण्याची भूमिका सरकारने घेतली असल्याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube