आत्महत्या नाही खूनच! गौरीच्या कुटुंबाने जावई अनंतविषयी दिली धकाकदायक माहिती

कुणी काहीही म्हटलं तरी माझ्या मुलीचा हा खून आहे. तसंच, जर माझ्या मुलीचा खून नाही तर आरोपी फरार का झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 25T163552.832

माझ्या मुलीला मारलं नाही तर मग अनंत गर्जे फरार का झाला? असा प्रश्न उपस्थित करत ही आत्महत्या नसून हा खून आहे. तीच्या मानेवर मारहाणीच्या खुना आहेत असाही थेट आरोप गौरी (Garje) पालवेच्या कुटुंबाने केला आहे. त्याचबरोबर काही दिसांपूर्वी आंबेजोगाई येथील मुलीसोबत अनंत गर्जे यांचे संबंध होते. त्यावेळी मुलीचा गर्भपात करण्यात आला होता त्याची कागदपत्र गौरीला सापडले असा धक्कादायक खुलासाही गौरीचे वडील अशोक पालवे यांनी केला आहे.

गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी गौरीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी याआधीही केली होती. आज या प्रकरणावर बोलताना गौरी गर्जे यांच्या वडिलांनी आरोप केला की, गौरीने गळफास घेतला असता, तर तिच्या गळ्यावर तशा खुणा असत्या. तिच्या छातीवर मारहाणीच्या खुणा होत्या, तिच्या डोक्याला मार लागलेला होता. मारहाणीत तिचा मृत्यू झाला असा दावा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर हे सगळ तपास अधिकारी लपवत आहेत असंही तीचे वडील म्हणाले आहेत.

डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी रात्री उशीरा पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक

माझ्या मुलीला मारण्यात आलं आहे. ती आत्महत्या करू शकत नाही, ती खूप स्ट्राँग होती. नातेवाईक यायच्या आधी पंचनामा का करण्यात आला? तुम्ही तुमच्या बहिणीला फोन का केले? तुम्ही यात दोषी नाहीत तर फरार का झालेत याचं उत्तर द्यावं असंही गौरी यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्याशी आपलं बोलण झालं असून या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हावी असं त्या म्हणाल्या असंल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

गौरीच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूनंतर अनेक दावे केले आहेत. तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद आणि छळ हे कारण असल्याचं बोललं जात आहे. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय गौरी यांना होता. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. अनंत गर्जे मुलींसोबत चॅटिंग करत असल्याचं गौरीच्या लक्षात आलं होते. तिने माफ केल्यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याने दोघांमध्ये कडाक्याची भांडणे झाली. अनंत गर्जे गौरीला खूप टॉर्चर करत होते, असा आरोप गौरीच्या मामांनीही केला होता.

गौरीची आई काय म्हणाली?

अलकनंदा पालवे यांनी म्हटले की, मला संध्याकाळी सात वाजता फोन आला, समोरून सांगण्यात आलं की, गौरी गेली तिने फाशी घेतली. माझा आरोप आहे की ती आत्महत्या नसून हत्या आहे. शितल गर्जे, अनंत गर्जे आणि अजय गर्जे यांनी तिची हत्या केली. हत्या करून हे पळून गेले तिथे थांबले नाहीत. छळ करत त्या तिघांनी माझ्या मुलीची हत्या केली. तिघांचीही व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे फक्त अनंतलाच अटक का केली. बाकीच्या दोघांनाही अटक करा.

पुढे बोलताना अलकनंदा पालवे यांनी म्हटले की, तिचा मृतदेह पाहिल्यानंतर छातीला आणि डोक्याला मार होता. आत्महत्या केल्यानंतर गळ्याला वन असू शकतात मात्र डोक्याला आणि छातीला व्रण आले कुठून? अनंतचा एकच मोबाईल जप्त केला आहे दुसरा मोबाईल जप्त केलेला नाही? हे दोन प्रश्न उपस्थित करत त्यांनी एसआयटी मार्फत या घटनेचा तपास व्हायला हवा. बाकीच्या कोणत्याच तपासावर माझा विश्वास नाही असं विधान केलं आहे.

त्याचबरोबर, या आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी. एवढं शिक्षण मी माझ्या मुलीला दिलं. कशातच कमी माझी मुलगी नव्हती.अनंत खूप मारतो अशी तक्रार देखील तिने केली होती. तो मला कधीच कॉल करत नव्हता भांडण झाल्यानंतरच मला कॉल करत होता. आम्ही गेलो तेव्हा आमची मुलगी पोस्टमार्टम रूम मध्ये होती. पंचनामा न करता डायरेक्ट तिला पोस्टमार्टम रूम मध्ये नेलं. त्याच्या बहि‍णीने भावाने आणि अनंतने मिळून माझ्या मुलीला मारलं.

CCTV देण्याची मागणी

गौरीच्या हत्येच्या आरोपात नणंद आणि दिराला अटक करण्याची मागणी गौरीच्या वडिलांनी केली आहे, गौरी पालवेच्या वडीलांनी वरळी पोलिसांना पत्र लिहलं आहे. गौरीच्या हत्याप्रकरणात फक्त अनंत गर्जेला अटक झाली, या प्रकरणात दीर अजय गर्जे आणि नणंद शितल आंधळे मोकाट फिरत आहेत, असा उल्लेख पत्रात करण्यात आला. तर अनंत आणि गौरी राहत होते त्या बिल्डींगचा CCTV देण्याचीही मागणी गौरीच्या वडिलांनी केली आहे.

follow us