भिक्षेकरी बांधवांच्या स्वावलंबनासाठी पहिला प्रकल्प श्रीगोंद्यात; मंत्री लोढांची माहिती

भिक्षेकरी बांधवांच्या स्वावलंबनासाठी पहिला प्रकल्प श्रीगोंद्यात; मंत्री लोढांची माहिती

भिक्षेकरी समाज बांधवांना सन्मानाने जगता यावे, कष्टाची भाकरी मिळून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी वसुधा प्रकल्पाच्या माध्यमातून भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबनच्या उद्देशाने उपक्रम राबविण्यात येत आहे. याचा पहिला प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा येथे सुरू होत आहे. यामुळे भिक्षेकरी समाजबांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत हाेणार आहे. यापुढेही असे प्रकल्प राज्यभर सुरू करण्याचा मानस महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे.

राज्यशासनाच्या महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने वसुधा प्रकल्प अर्थात भिक्षेकरी पुर्नवसन व स्वावलंबनाच्या उद्देशाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित गोशाळा व इतर समाजपयोगी उपक्रमांचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे-पाटील आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

Post Account Scam : पुण्यात पोस्ट खात्यात कोट्यावधीचा घोटाळा; तीन पोस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

महिला बालविकास व महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे विधिमंडळाच्या दालनातून वसुधा प्रकल्प अर्थात भिक्षेकरी पुर्नवसन उपक्रमांचा ऑनलाइन उद्घाटनाप्रसंगी ते बाेलत हाेते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आदी उपस्थित हाेते. मंत्री विखे म्हणाले, ”वसुधा पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सबका साथ सबका विकास या माध्यमातून सर्वांगीण विकासाच्या दिशेने आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत.”

भाजपा आमदार म्हणाल्या…तुम्ही म्हणता हे शेतकऱ्यांचे सरकार मात्र इथं बळीराजा मदतीपासून वंचित

यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त आर विमला, अहमदनगर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, महिला आर्थिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिक डॉ. इंदू जाखड, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे आदी मान्यवर आणि श्रीगोंदा तालुक्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube