Municipal Election 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंद्यात सर्वाधिक तर श्रीरामपूरमध्ये मतदानाचा टक्का घसरला
Municipal Election 2025 : नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी कालराज्यभरामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील
Municipal Election 2025 : नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी कालराज्यभरामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील देखील आठ नगरपालिका नगरपंचायतींचा समावेश होता मतदानाची टक्केवारी पाहता आठ नगरपंचायतींपैकी श्रीगोंदा मध्ये सर्वाधिक 79.84% मतदान झाले तर सर्वाधिक कमी हे श्रीरामपूर मध्ये 66.62% मतदान झाले दरम्यान जिल्ह्यातील एकूण आठ ही नगरपरिषद नगरपालिकांची एक टक्केवारी काढली असता 72.25% मतदान हे झाले.
आठ नगरपंचायतीत कोठे किती टक्के मतदान
अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ नगरपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी (Municipal Election 2025) मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली अंतिम आकडेवारी हाती आलेली असून त्यानुसार श्रीरामपूर मध्ये 66.62% संगमनेर मध्ये 72.75% राहुरी मध्ये 72.46% राहता मध्ये 77.87% श्रीगोंदा मध्ये 79.84% शेवगाव मध्ये 69.4% जामखेड मध्ये 75.63% तर शिर्डी मध्ये 75.16% एकूण मतदानाची टक्केवारी काढले असता 72.25% एवढे मतदान झाले.
संगमनेर व जामखेड लढतीकडे राज्याचे लक्ष
जिल्ह्यातील आठ पैकी दोन नगरपालिका नगरपंचायतींमध्ये प्रस्थापित राजकारण्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे यामध्ये संगमनेर व जामखेड याचा समावेश असून संगमनेरमध्ये तांबे विरुद्ध खताळ असा सामना होणार आहे तर जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध असा सामना होणार. जोरदार प्रचार करत सभा रॅलीद्वारे या दिग्गजांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला अखेर मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडून उमेदवारांचे भवितव्य मतदार पेटीत कैद झाले आहे मात्र या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी न होता 21 डिसेंबर रोजी होणार आहे याबाबतचा निकाल नागपूर खंडपीठाने दिला आहे यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मतदानात श्रीगोंदा अग्रेसर तर श्रीरामपूर पिछाडीवर
मतदानाची अंतिम आकडेवारी हाती आल्या असता यामध्ये श्रीगोंदा मध्ये सर्वाधिक जवळपास 80 टक्के मतदान झाले तर सर्वाधिक कमी 66% मतदान श्रीरामपूर मध्ये पार पडले. श्रीगोंदा मध्ये पाचपुते विरुद्ध नागवडे जगताप शेलार असा सामना पाहायला मिळणार आहे तर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले श्रीरामपूरमध्ये प्रकाश चित्ते करण ससाने व भाजपकडून देण्यात आलेले उमेदवार बिहाणी यांच्यामध्ये निवडणूक येथील सामना लागणार आहे.
महापालिका निवडणुका कधी होणार? संभाव्य तारीख समोर; जाणून घ्या सर्वकाही
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूरमध्ये माजी खासदार सुजय विखे यांनी चांगलेच लक्ष घातलेले आहे तसेच त्यांच्या प्रतिस्पर्धी महायुतीमधीलच उमेदवार असलेले शिवसेनेकडून प्रकाशिते यांनी देखील मंत्री राधाकृष्ण विखेंवरती जोरदार आरोप करत या निवडणुकीमध्ये आघाडी घेतली होती. काँग्रेसकडून करण ससाने तर भाजपकडून बिहानी अशी तिरंगी लढत श्रीरामपूरमध्ये होणार आहे.
