संभाजीराजेंची सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर जोरदार टीका, अधिवेशन म्हणजे जनतेच्या पैश्यांची नासाडी
![संभाजीराजेंची सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर जोरदार टीका, अधिवेशन म्हणजे जनतेच्या पैश्यांची नासाडी संभाजीराजेंची सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर जोरदार टीका, अधिवेशन म्हणजे जनतेच्या पैश्यांची नासाडी](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2022/12/sambhajiraje-chhatrapati-83034481.jpg)
नांदेड : संभाजीराजे छत्रपती यांनी स्थानिक प्रश्नांसोबतच विधानसभेत होत असलेल्या गदारोळाविषयी भाष्य करताना सरकारसह विरोधकांवर निशाना साधला. शुक्रवारी शेतकरी दिन असून देखील शेतकऱ्यांसाठी सरकार काहीही करत नसल्याचे भाष्य संभाजीराजे छत्रपती महाराजांनी केले. हिवाळी अधिवेशन म्हणजे जनतेच्या पैश्यांची नासाडी असल्याची जोरदार टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली
संभाजीराजे छत्रपती महाराज यांच्या स्वराज्य संकल्प अभियानाच्या दोन दिवसीय नांदेड दौऱ्यावेळी जवळपास 70 शाखांचे उद्घाटन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर व हदगाव तालुक्यात स्वराज्य संघटनेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शुक्रवार दि. 23 व दि. 24 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. प्रत्येक गावात अनोख्या पद्धतीनं स्वराज्य संघटनेचं स्वागत करण्यात आलं. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वराज्यला मिळालेल्या विजयामुळं स्वराज्यने राजकारणात यावे ही लोकांची भावना असल्याचे बोलत ‘स्वराज्य’बाबत राजकीय संकेत दिले.
अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काहीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे संभाजीराजेंनी टीका केली. युवकांच्या प्रतिसादामुळे बऱ्याच ठिकाणचे कार्यक्रम वेळेपेक्षा दोन ते अडीच तास उशीराने होत होते.