अहिल्यानगरमध्ये पुढील दोन दिवस पाऊस; हवामान विभागाचा अंदाज…

Ahilyanagar Rain Update : अहिल्यानगरच्या काही भागात 16 आणि 17 मे रोजी अर्थात पुढील दोन दिवस वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह गारपीट (Ahilyanagar Rain Update) होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनकडून करण्यात आलं आहे.
‘कायर समझा था क्या? फायर हूं मैं…; पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न, तरीही राहुल गांधींनी केलं भाषण
नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी…
मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये.
वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये.
वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे.
मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये.
सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या किंवा लोंबकळणाऱ्या केबल्स पासून दूर रहावे.
जाहिरात फलक (होर्डिंग्ज्) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये.
मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे.
धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये.
धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.
वादळी वारा, पाऊस व गारपीट यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.
शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.
दरम्यान, वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ अथवा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.