अहमदनगरमधील शांतता भंग करणाऱ्या धर्मांधांना आवरा; मनसे आक्रमक

  • Written By: Published:
अहमदनगरमधील शांतता भंग करणाऱ्या धर्मांधांना आवरा; मनसे आक्रमक

अहमदनगरमधील (Ahmednagar) कापड बाजारातील तीन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्याचे राजकीय पडसाद उमटत आहे. या घटनेनंतर मनसे आक्रमक झाली आहे. अहमदनगरमधील शांतता भंग करणाऱ्या धर्मांधांना प्रशासनाने आवर घातली पाहिजे, अशी मागणी मनसेचे विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा (Sumit Varma) यांनी केली आहे.

बावनकुळेंना पक्षातच किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार ? ; पटालेंचा बावनकुळेंना टोला

नगर शहरात हरामखोरी जास्त वाढत चालली आहे. याविरोधात पावले उचलली गेली नाहीत तर बाजारपेठ इतिहास जमा होईल. बाजारपेठेत दररोज काही ना काही घटना घडत आहेत किंवा घडवल्या जात आहेत. शहराची शांतता भंग करण्याचे काम काहींनी अतिशय मनावरच घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

शहराचे नाक समजले जाणार कापड बाजार, नवी पेठ , घास गल्ली, गंजबाजार या ठिकाणी काही धर्मांध लोकांनी बेकायदेशीर रित्या आपापली सल्तनत उभी केली आहे आणि आता त्याच माध्यमातून ही अतिक्रमणरूपी मोगलाई वाढत असल्याचे चित्र बाजारात दिसत असल्याचा आरोप वर्मा यांनी केला आहे.

जो व्यापारी कोटींच्या रुपात शासनाला कर देतो त्याच व्यापाऱ्याचा गळा घोटण्याचे काम या अतिक्रमणधारकांच्या माध्यमातून आणि यांना पोसणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांच्या माध्यमातून सुरू आहे. आता मात्र याला उत्तर देण्याची वेळ आली आहे.

आज जर व्यापाऱ्यांनी आवाज उठवला नाही तर हा बाजार लवकरच मोहल्ला म्हणून घोषित होईल आता संघटित होऊन उत्तर देणार अशीच भूमिका आता घेणं आवश्यक आहे. दिवसाढवळ्या वार करण्याची हिंमत या लोकांमध्ये येते कुठून? धारधार शस्त्र जर हे गावगुंड घेऊन फिरत असतील तर आता स्वसंरक्षणासाठी व्यापाऱ्यांना शस्त्र ठेवण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे प्रसिद्धी पत्रकात वर्मा यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube