नाशिक : मुक्त विद्यापीठातील राम मंदिराचा कार्यक्रम वादात : पुरोगामी विचारवंतांची सडकून टीका

नाशिक : मुक्त विद्यापीठातील राम मंदिराचा कार्यक्रम वादात : पुरोगामी विचारवंतांची सडकून टीका

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरु प्रा.संजीव सोनवणे यांच्या हस्ते पार पडलेला ‘श्रीराम मंगल अक्षदा कलश’ स्वागत आणि पूजनाचा कार्यक्रम वादात सापडला आहे. विद्यापीठाच्या नाव यशवंतराव चव्हाण यांच्या नावावरुन आहे, विद्यापीठ की धर्मपीठ’ असे म्हणत या कार्यक्रमावर पुरोगामी विचारवंतांनी सडकून टीका केली आहे. (Shri Ram Mangal Akshada Kalash’ reception and worship program held in the premises of Yashwantrao Chavan Maharashtra Open University has been mired in controversy)

नेमके प्रकरण काय?

अयोध्येमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने या प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे निमंत्रण घेऊन अयोध्या येथून मंगल अक्षदा कलश नाशिक शहरात आणला आहे. या मंगल अक्षदा कलशाचे भव्य स्वागत आणि पूजनाचा कार्यक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरु प्रा.संजीव सोनवणे यांच्या हस्ते पार पडला.

Box Collection: प्रभासच्या ‘सालार’ चा ‘डंकी’ ला फटका? नवव्या दिवशी किंग खानच्या चित्रपटाच्या कमाईत घट

काल (29 डिसेंबर) संध्याकाळी विद्यापीठाने एक परिपत्रक काढून याविषयीची माहिती दिली होती. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात व्हावा आणि कुलगुरू महोदयांच्या हस्ते व्हावा अशी विनंती अभाविपने केली होती. याशिवाय विद्यापीठातील सर्व नियमित / करारावरील शिक्षक, अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे निर्देश या परिपत्रकात देण्यात आले होते.

May be an image of text

पुरोगामी विचारवंतांची सडकून टीका :

दरम्यान, याच कार्यक्रमावर पुरोगामी विचारवंत विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, निखील वागळे, मिलिंद चव्हाण, निशा शिरुरकर यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात टीका केली.

कुठलंही विद्यापीठ इतकं मुक्त असायला हवं, अशी उपहासात्मक टीका विजय चोरामारे यांनी केली आहे. तर विद्यापीठाकडून हे अपेक्षित नाही. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. जे आज याचे समर्थन करत आहेत, त्यांनी उद्या इतर धर्मियांनी विद्यापीठात असे काही केलेले चालेल का, असा प्रश्न स्वतःला विचारावा. विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्रशासनाचा ही तीव्र निषेध. अशी टीका मिलिंद चव्हाण यांनी केली.
नाशिकच्या मुक्त विद्यापीठ स्थापनेचे दिवस आठवतात. आमचे मित्र आणि जेष्ठ विचारवंत वसंतराव पळशीकर अभ्यासक्रम तयार करण्याच्या समितीत होते. विविध क्षेत्रातील तज्ञ, कार्यकर्त्यांशी चर्चा करुन अभ्यासक्रम तयार झाला. मुक्त विद्यापीठ मुक्त विचारांचे असावे यासाठी यशस्वी प्रयत्न झाले. कालचे कुलसचिवांच्या सहीचे अयोध्या अक्षदा कलशाच्या स्वागतासाठी कुलगुरूंच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे परिपत्रक वाचले. मुक्त व विवेकी विचारांसाठी निर्माण झालेल्या विद्यापीठाला अविवेकाच्या काजळीने ग्रासले आहे. ज्ञानाचा प्रकाश काळवंडला आहे, अशी खंत निशा शिरुरकर यांनी व्यक्त केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube