Mumbai Rain : मुंबईसह ठाण्यात अवकाळी पावसाचं थैमान…

Mumbai Rain : मुंबईसह ठाण्यात अवकाळी पावसाचं थैमान…

मुंबई : आज पहाटेपासून मुंबईसह, ठाणे, कल्याण डोंबिवलीत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. आता अवकाळीने आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे.

पंतप्रधानांनी लुटला पाणीपुरीचा आनंद

काल रात्रीपासूनच मुंबईसह, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवलीत ढग दाटून आले होते. अखेर पहाटेच्या सुमारास हलक्या स्वरुपात पाऊस सुरु झाला. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्यानंतर जोरदार पावसाची बॅटिंग सुरु झाली होती. अद्यापही ठाण्यात पाऊस सुरु आहे. तर वसई-विरारमध्येही पावसाची रिमझिम सुरुच आहे.

गीतकार जावेद अख्तर यांना मोठा धक्का…

अवकाळी पावसाने आधी महाराष्ट्रातील खेडोपाड्यांत हजेरी लावली आता अर्थिक राजधानी मुंबईसारख्या शहरात अवकाळी फटका बसत आहे. सकाळच्या सुमारास नोकरीला जाणाऱ्या नागरिकांनी या अवकाळी पावसाला सामोरं जावं लागत आहे. अवकाळी पावसाने चाकरमान्यांची तारांबळ उडाली असून उपनगर भागातील ट्रेन वाहतून अद्याप तरी सुरळीत आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा, गहू, हरभरा, ज्वारी, टरबूज, खरबूज, संत्रा, बागायतदार शेतकऱ्यांना मोठा अर्थिक फटका बसला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube