तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, सरकारने इंडिगोला दिली शेवटची संधी

IndiGo And Turkish Airlines Deal : इंडिगोने (IndiGo) तुर्की एअरलाइन्सकडून (Turkish Airlines) दोन B777-300ER विमाने भाड्याने घेतले आहे. ज्याची अंतिम मुद्दत 31 मे 2025 पर्यंत आहे. मात्र या कराराला आणखी सहा महिन्यांसाठी वाढवण्यात यावे अशी विनंती केली होती जी सरकारकडून मान्य करण्यात आली नाही. तात्काळ उड्डाण व्यत्ययामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी, इंडिगोला या भाड्याने घेतलेल्या विमानांसाठी 31 ऑगस्ट 2025 पर्यंत तीन महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. असेही सांगण्यात आले की इंडिगो या कालावधीत तुर्की एअरलाइन्ससोबतचा भाड्याने घेतलेला करार रद्द करेल आणि या कामांसाठी आणखी मुदतवाढ मागणार नाही.
Centre has given 3 months to #IndiGo to break ties with #TurkishAirlines. pic.twitter.com/DsFBQhuIIa
— News IADN (@NewsIADN) May 30, 2025
दिल्लीसह भारतातील नऊ प्रमुख विमानतळांवर सेवा हाताळणाऱ्या तुर्कीशी संबंधित फर्म सेलेबी एव्हिएशनसाठी सरकारने सुरक्षा मंजुरी रद्द केल्यानंतर काही आठवड्यांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Extension of damp lease of two B777-300ER aircraft by IndiGo Airlines from Turkish Airlines.
DGCA says, “IndiGo is currently operating two B777-300ER aircraft under damp lease from Turkish Airline, which was permitted upto 31.05.2025. IndiGo requested for a further extension of… pic.twitter.com/S2HijDq0Bx
— ANI (@ANI) May 30, 2025
पाकिस्तानला पाठिंबा
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. यानंतर पाकिस्तानने भारताच्या 15 शहरांवर हवाई हल्ले करण्यासाठी तुर्की ड्रोनचा वापर केला होता. तर तुर्की सरकारने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने सरकारने तुर्कीविरुद्धही कारवाई केली आहे.
माध्यमांशी बोलताना इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स (Pieter Albers) म्हणाले होते की एअरलाइन सर्व भारतीय विमान वाहतूक नियमांचे पालन करते. आम्ही करार आणि सरकारी नियमांनुसार काम करतो. जर ते नियम बदलले तर आम्ही त्यानुसार बदल करू. इंडिगोच्या 400 हून अधिक विमानांपैकी फक्त दोन विमाने तुर्की एअरलाइन्सकडून भाड्याने घेतली जातात असं माध्यमांशी बोलताना इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स म्हणाले होते.
मोठी बातमी, इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंना संधी
पहलगाम हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी संघटनांना जबाबदार असल्याने भारताने 6 मे च्या रात्री पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर राबवत 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते.