Nirmala Sitaraman : मोदींच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था 10 वरून 5 व्या क्रमांकावर पोहचली…

Nirmala Sitaraman : मोदींच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था 10 वरून 5 व्या क्रमांकावर पोहचली…

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून बजेट सादर करण्यासल सुरूवात झाली आहे. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला त्या म्हणाल्या, 2023-24 साठीचा अर्थसंकल्प मी सादर करत आहे.

पंतप्रधान मोदींच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात आपली अर्थव्यवस्था 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर पोहचली आहे. याचं कारण म्हणचे विविध लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी. शाश्वतविकासासाठी आपण विविध योजना राबवल्या. या योजनांनी गेल्या 9 वर्षांत खूप मोठा पल्ला गाठला. ही खूप आनंदाची बाब आहे.

या योजना शेवटच्या स्तरापर्यंचत पोहचवण्याचं काम केंद्र सरकारकडून करण्यात आलं. त्यामुळे सर्वांगीन विकासाचं स्वप्न साकार होताना दिसत आहे. 102 कोटी लोकांचं कोविड व्हॅक्सिनेशन करण्यात आलं. इतक्या मोठ्या प्रमाणात हे लसाकरण करण्यात ही योजना सरकारकडून यशस्विरित्या राबवण्यात आल्या.

जगातील मोठ्या अर्थव्यवस्था मंदीतून जात असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र पाय घट्ट रोवून उभी आहे. जी पावलम आपण उचलली आहेत त्यामुळे आपलं भविष्य उज्वल आहे. त्यामुळे आपण जी प्रगती करत आहोत. ती पाहून ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट घेतले ते आपल्याला आशीर्वात देतील. जागतिक मंचावर भारताचं महत्त्व वाढत आहे. करण आपण कोविन अॅप असो, यूपीआय सारखं आपण उचललेल पाऊल असो या लगळ्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं महत्व वाढच आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube