पंतप्रधान मोदींच्या कमी झोपण्यावरुन केजरीवालांनी उडवली खिल्ली

पंतप्रधान मोदींच्या कमी झोपण्यावरुन केजरीवालांनी उडवली खिल्ली

नवी दिल्ली : दिल्लीचे (Delhi)मुख्यमंत्री आणि आपचे (Aap) नेते अरविंद केजरीवाल (arvind kejriwal)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi)सडकून टीका केली आहे. दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये मोदी हटाओ, देश बचाओ रॅलीला संबोधित करताना केजरीवालांनी मोदींवर टिकास्त्र सोडलंय. ते म्हणाले की, मोदींना निद्रानाशाचा त्रास आहे. त्यांनी डॉक्टरांना दाखवून घ्यावे, औषध घ्यावे. ते म्हणाले की, झोपेच्या कमतरतेमुळे मोदी चिडचिडे राहतात आणि सर्वांना तुरुंगात टाकत आहेत.

दिल्लीत मोदींविरोधात पोस्टर चिकटवल्याबद्दल काही जणांना अटक केली होती. त्याचा संदर्भ देत त्यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, इंग्रजांनी पोस्टर चिकटवल्याबद्दल कोणालाही अटक केली नाही. ते म्हणाले की, मोदी इतके घाबरलेले आणि असुरक्षित आहेत की ते पोस्टर लावणाऱ्याला तुरुंगात टाकत आहेत.

राजकारणात योगायोग नसतात; फडणवीस-ठाकरे यांना कोणाला मेसेज द्यायचाय ?

केजरीवालांनी सांगितले की, मला भाजपचा कार्यकर्ता भेटला, तो म्हणाला की पंतप्रधान मोदी 18 तास काम करतात. तो म्हणाला की, ते फक्त तीन तास झोपतात. त्यावर मी म्हणालो की एवढं झोपून चालत नाही. त्याच्यावर तो कार्यकर्ता म्हणाला की, त्यांना दैवी शक्ती मिळालेली आहे. मी म्हणालो की वेड्या याला दैवी शक्ती म्हणत नाहीत तर झोपेचा आजार म्हणतात. पंतप्रधानांना नीट झोपायला सांगा. झोप आली नाही तर झोपेची गोळी घ्यायला सांगा. चांगल्या डॉक्टरांना दाखवून घ्या असेही यावेळी त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, पंतप्रधान नीट झोपले नाहीत तर ते दिवसभर चिडचिड करत राहतात. तुम्ही त्यांना कधी हसताना पाहिले आहे का? दिवसभर चिडचिडे राहातात. राग येत राहतो, याला तुरुंगात टाकतात त्याला तुरुंगात टाकतात. मी देवाकडे पंतप्रधानांच्या निरोगी राहण्यासाठी प्रार्थना करतो. पंतप्रधान निरोगी राहिले तरच देशाची प्रगती होईल,असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube