पुलवामानंतर सर्जिकल स्ट्राईक झालाच..काँग्रेस खासदाराचं मोठं विधान, नक्की काय म्हणाले?

MP Charanjit Channi on Surgical Strikes : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने याला चोख प्रत्युत्तर द्यावं, अशी भावना सर्वच विरोधी पक्षांनी व्यक्त केलेली आहे. तसंच, सरकार जी कारवाई करेल, त्याला आमचा पाठिंबा असेल अशी ठोस भूमिकाही अनेक नेत्यांनी मांडली आहे. काँग्रेसनेही पहिल्या दिवसापासून (Strikes) केंद्र सरकारच्या पाठिशी असल्याची भूमिका मांडली. मात्र आता काँग्रेसचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
सर्जिकल स्ट्राईकवर कुठ झाला?
खासदार चरणजीत सिंह चन्नी यांनी पत्रकार परिषदेत पहलगाम हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकवर भाष्य केले. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात यावं, अशी भावना व्यक्त करत असताना त्यांनी २०१९ साली झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या सर्जिकल स्ट्राईकचा अद्याप एकही पुरावा समोर आलेला नाही, असे ते म्हणाले.
पहलगामनंतरही पाकिस्तानच्या कुरापती; सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार, भारतीय जवानांचं थेट उत्तर
चन्नी पुढे म्हणाले, पहलगामवरील हल्ल्याला १० दिवस झाले तरी सरकारने अद्याप ठोस पाऊले उचलली नाहीत. आमची मागणी आहे की, पाकिस्तानविरोधात ठोस आणि कठोर कारवाई व्हावी. संबंध देश सरकार काय कारवाई करणार याकडे लक्ष ठेवून आहे. तथाकथित ५६ इंचाची छाती काय कारवाई करणार? याची लोक वाट पाहत आहेत. सरकारने यावर जलद निर्णय घेऊन पाऊले उचलावीत, अशी आमची अपेक्षा आहे.
सर्जिकल स्ट्राईक कुठे झाला?
२०१९ साली पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान मारले गेले. या घटनेचा वापर सरकारने निवडणुकांसाठी केला असल्याचा आरोप चन्नी यांनी केला. पुलवामा घटनेनंतर भारताने पाकिस्तानात कुठे सर्जिकल स्ट्राईक केला, यात किती लोक मारले गेले, हे काही दिसले नाही. जर कुणी आपल्या देशात बॉम्ब फेकला, तर लोकांना कळणार नाही का? सरकारने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला. पण वास्तवात काहीच घडले नाही. सर्जिकल स्ट्राईकचा एकही पुरावा नाही, कुणीही तो पाहिला नाही, असा दावा खासदार चरणजीत सिंह चन्नी यांनी केला.