माझ्या जन्मापूर्वी निर्माण झालेला निळवंडे धरणाचा प्रश्न मोदींनी सोडवला -देवेंद्र फडणवीस

माझ्या जन्मापूर्वी निर्माण झालेला निळवंडे धरणाचा प्रश्न मोदींनी सोडवला -देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : अहमदनगर येथे 2014 आणि 2019 ला मोदींची प्रचार सभा झाली होती. त्या दोन्ही सभांना मी उपस्थित होतो. त्यामुळे सांगतो या दोन्ही सभांचं रेकॉर्ड या सभेने मोडलं आहे अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस अहमदनगर येथील सभेला संबोधिक केलं. अहमदनगर येथे महायुतीचे लोकसभा उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा आयोजीत करण्यात आली होती. त्यामध्ये फडणवीस बोलत होते.

 

जिल्हा जलमय करणार

माझ्या जन्माच्या अगोदर सुरू झालेलं निळवंडे पूर्ण झालं. ही नरेंद्र मोदी यांची जादू आहे. असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. पाणी परिषदेच्या माध्यमातून वाहून जाणारं पाणी नगर नाशिक आणि मराठवाड्यात सुरू असलेला वाद मिटवून जिल्हा जलमय करण्याचं काम मोदी करणार आहेत असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

 

अनेक उद्योग व्यावसाय येणार

देशातील चार महत्वाचे महामार्ग नगर जिल्ह्याशी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे या जिल्ह्याचा विकास झपाट्याने होणार आहे. तसंच, अधिक कंपनी उद्योग येथे येणार असून इथल्या तरुणांना काम देण्याचं कामही मोदी सरकार करणार आहे असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच, महाराष्ट्रातील इतर विकसीत शहरांत अहमदनगर शहर असेल असंही ते म्हणाले.

 

नवीन उद्योग येणार

अहमदनगर शहरासह शिर्डी शहराचीही ओळख बदलत आहे. मोठे-मोठे उद्योग येत आहेत. शिर्डी शहरात नवीन विमानतळ होत आहे. त्या शहराची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे या शहरांचा विकास झपाट्याने होत आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना मोफत विज देण्याचाही प्रयत्न राहणार आहे असंही फडणवीस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube