मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवारांच्या हातात द्यावी; राजू शेट्टींचे मोठे वक्तव्य

  • Written By: Published:
मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवारांच्या हातात द्यावी; राजू शेट्टींचे मोठे वक्तव्य

Raju Shetty : राज्यात नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घेणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व सूत्र अजित पवारांच्या (Ajit Pawar)हातात द्यावीत. असं मोठं विधान शेट्टी यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळं राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

आमची बाजू ऐकून….; दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंकडून हायकोर्टात कॅव्हेट दाखल 

राजू शेट्टी हे शेतकरी प्रश्नांवरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता त्यांनी आत्मक्लेश यात्रा काढली आहे. या यात्रेत बोलतांना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ऊसाच्या मागच्या वर्षीचा दुसरा हप्ता चारशे रुपये द्यावा, यासाठी ही आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली. जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर यंदाचा ऊस गळीतप हंगाम सुरू करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेट्टी यांनी घेतली आहे. तसेच कारखान्यातील वजन काटे डिजिटल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

या यात्रेत राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला. ते म्हणाले, राज्य सरकार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व सूत्रं अजित पवार यांच्या हातात द्यावीत. अजित पवार हे साखर कारखानदारांचे कैवारी आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे, असं शेट्टी म्हणाले

काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांना सरकारमधून बाहेर पडण्याचं आवाहन केले होते. सध्याच्या सरकारमध्ये, सत्तेत काहीच उरलेले नाही. सरकारमधून बाहेर पडा. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात लढा देऊ. शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरू, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केल्यानं राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

राजू शेट्टींच्या आवाहनानंतर बच्चू कडू यांनी राजू शेट्टींची भेट घेतली होती. ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात काही अंदाज बांधले जात आहेत. त्यातच आता त्यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शेट्टी यांनी केलेल्या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube