Devendra Fadnavis : “…अन् मातोश्रीची दरवाजे माझ्यासाठी बंद केले, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली खंत

Devendra Fadnavis : “…अन् मातोश्रीची दरवाजे माझ्यासाठी बंद केले, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली खंत

मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विरोधी सत्ताधारी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. अशातच सत्ताधारी भाजपकडून विरोधी नेत्यांवर ईडीची चौकशी लावत असल्याने आरोप सतत होत असताना दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) असले तरी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशिवाय मत मिळत नाही हे मान्य केलं आहे. हिंमत असेल तर मोदींच्या नावानं मतं मागून दाखवा. होऊन जाऊ द्या, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (UddhavThackeray) भाजपाला दिलं होतं. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे मुंबई सीपी संजय पांडे यांना दिलं होतं म्हणतं मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे. याबरोबरच फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील केली आहे. ते म्हणाले २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचे फोटो लावून निवडून आले आहेत.

आपण एकत्र सरकार चालवतो, एकत्र काम करतो. माझा फोनही उद्धव ठाकरेंनी घेतला नाही. साधा फोन करून तरी सांगायला पाहिजे होत आम्हाला तुमच्यासोबत यायचं नाही, अशी खंत ही त्यांनी बोलून दाखवली. परंतु, वैयक्तिक कोणतेही वैर नाही आहे. एका कार्यक्रमात रश्मी ठाकरे भेटल्या होत्या. त्यांच्याशी बोललो आणि उद्धव ठाकरेंना माझा नमस्कार सांगा असे देखील म्हटलं. कारण, महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. त्यापलिकडे जाणार नाही,” असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी खंत व्यक्त केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube