कुंडमळा पूल दुर्घटना : उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक, पुणे पोलिस अधीक्षक…

Kundmala Bridge Collapse Maharashtra Administration officials Meeting : पुण्यात रविवारी (15 जून) एक मोठी दुर्घटना (Pune News) घडली. इंद्रायणी नदीवर बांधलेल्या पुलाचा अर्धा भाग (Kundmala Bridge Collapse) कोसळला. पूल कोसळला तेव्हा पुलावर अनेक लोक उपस्थित होते. आतापर्यंत चार जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. पुण्यातील पूल कोसळण्याच्या घटनेबाबत आज महाराष्ट्रातील (Maharashtra Administration officials Meeting) उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. राज्याचे मुख्य सचिव त्यांच्या कार्यालयात बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत.(Kundmala Bridge Collapse)
उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, ग्रामीण विकास विभागाचे प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते), पुणे विभागीय आयुक्त, पुणे, पुणे जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे पोलिस अधीक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
Maharashtra | A meeting of top administration officials of Maharashtra was held regarding the bridge collapse in Pune today. State Chief Secretary is chairing the meet at her office, Additional Chief Secretary, Public Works Department , Principal Secretary, Rural Development…
— ANI (@ANI) June 16, 2025
पुण्यातील मावळ येथील कुंड मॉल येथे पूल कोसळल्याने काही पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येतंय. कोसळलेल्या पुलाच्या भागात दगड होते. दगडांवर पडणाऱ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याच वेळी, नदीच्या प्रवाहात अनेक लोक वाहून गेले आहेत.
सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य
रविवार असल्याने तिथे मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. काही लोक पुलावर उभे राहून त्यांचे फोटो काढत होते. किती लोक बुडाले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 20 ते २५ लोक बुडाले होते. घटनास्थळी सुमारे 200 पर्यटक उपस्थित होते. अपघातानंतर, बचाव कार्यात कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून सर्वांना घटनास्थळावरून पाठवण्यात आले होते.
अनेक मुलेही आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टी साजरी करण्यासाठी या पुलावर पोहोचली होती. येथे एक मंदिर देखील आहे, जिथे मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात. सध्या एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. आज सलग दुसऱ्या दिवशी देखील बचावकार्य सुरू आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणावर पुलावर उपस्थित होते, त्यांच्या वजनामुळेच पूल कोसळला, असं सांगितलं जातंय. यापूर्वी देखील पुलाच्या वाईट स्थितीबद्दल प्रशासनाकडे तक्रारी पोहोचल्या होत्या, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. पुलावर खूप गंज होता. खबरदारी घेण्याच्या सूचना सतत दिल्या जात होत्या. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे इंद्रायणी नदीतील प्रवाह जलद होता.