- Letsupp »
- pune
पुणे
-
आधी दादांचा फोटो हटवला, आता पवारांच्या सभेचे आयोजन; प्रशांत जगताप त्वेषाने मैदानात!
पुणे : अजित पवारांच्या बंडामुळे एकीकडे राष्ट्रवादीत अस्थिरतेचे वातावरण असतानाच दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. याची सुरूवात पवारांनी छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यातून केली. येथे पवारांनी मतदारांची माफी मागत माझा अंदाज चुकला सांगत माफी मागितली होती. त्यानंतर आता येत्या 17 ऑगस्टपासून पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात होणार असून, बीड येथे […]
-
‘ते’ दहशतवादी ‘इसिस’ अन् ‘अल सुफा’शी संबंधित; एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा…
पुण्यातील कोथरुडमध्ये नाकाबंदीदरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडून माहिती उगळवण्यात एटीएसला यश आलं आहे. हे दोन दहशतवादी ‘इसिस’ आणि ‘अल सुफा’ संघटनेशी संबंधित असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. त्यामुळे आता या गुन्ह्याची सुत्रे एटीएसकडून एनआयएकडे जाणार आहेत. ‘MPSCचं वार्षिक बजेट 60 कोटी अन् खाजगी कंपन्या 1500 कोटी गोळा करताहेत’; रोहित पवारांनी पुन्हा ठेवलं बोट […]
-
Shailaja Darade: राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अखेर अटक
Shailaja Darade Arrested : शिक्षक भरतीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन प्रभारी आयुक्त शैलेजा दराडे यांच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दराडे यांना सोमवारी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. भरतीसाठी पैसे घेतल्याप्रकरणी दराडे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर दराडे यांना अटक करण्यात आली आहे. (former commissioner […]
-
20 वर्षांपासून रखडलेलं काम अमितभाईंनी मार्गी लावलं : शाहंचं कौतुक करताना अजित पवार थकले नाहीत!
जेजुरी : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मागील 20-22 वर्षांपासून रखडलेलं काम मार्गी लावलं. देशातील साखर कारखान्यांना जवळपास 15 हजार कोटी रुपयांचा इन्मक टॅक्स लागला होता. आपल्या देशात ही रक्कम साडे सात ते 9 हजार कोटी रुपये होते. हा सगळा टॅक्स माफ केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता टनाला किमान 500 रुपये भाव जास्त […]
-
निवडणूक नागपूरमधूनच लढवणार, पण पुणे…; जेजुरीमध्ये फडणवीसांचं पुन्हा शिक्कामोर्तब
Devendra Fadanvis : ‘अजितदादा तुम्ही विविध योजनांबद्दल बोललात. मी तुम्हाला सिंचन मंत्री म्हणून अश्वस्त करू इच्छितो की, विविध सिंचन योजनांसह पुणे आणि पिंपरी मनपातील सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया करून ते पाणी उद्याोगांसाठी वापरू त्यामुळे उर्वरित पाणी सिंचनासाठी वापरता येईल आणि जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा प्रश्न मिटेल. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी पुरंदर एअरपोर्टसाठी केंद्रसरकारने सर्व परवानग्या दिल्या आहेत. […]
-
विरोधी पक्षात राहून जास्त कामं मार्गी लागत नाहीत; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar : महाराष्ट्रामध्ये प्रश्न अनेक आहेत, विरोधी पक्षात राहून जास्त काही कामं मार्गी लागत नाहीत. मी 30 वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये विरोधी तसेच सत्ताधारी पक्षात काम केले. सत्तेचा वापर हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो, अशी आम्हाला शिकवण आहे. त्यामध्ये शाहु, फुलेंच्या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी हे महायुतीचं सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. […]









