अजिंक्य रहाणेचं द्विशतक, मुंबईचा हैदराबादसमोर धावांचा डोंगर

  • Written By: Published:
5sporahane_cut_

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने आपल्या कामगिरीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईच्या कर्णधाराने रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध द्विशतक झळकावले. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर मुंबईने तीन शतके झळकावली. अजिंक्य रहाणे खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून बाहेर आहे.

रहाणेने हैदराबादविरुद्ध चांगली फलंदाजी करताना 261 चेंडूत 204 धावा केल्या. यादरम्यान त्याने 26 चौकार आणि 3 षटकार मारले. रहाणेने सर्फराज खानसोबत चौथ्या विकेटसाठी 196 धावांची भागीदारी केली. या सामन्यात सरफराज खाननेही शतक झळकावले आहे.

एकेकाळी भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग असलेला रहाणे खराब फॉर्ममुळे संघाबाहेर आहे. यासोबतच त्याला उपकर्णधारपदावरूनही हटवण्यात आले आहे. अशा स्थितीत रहाणेने रणजी ट्रॉफीने भारतीय संघात पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. येथे त्याने या संधीचा फायदा घेत शानदार प्रदर्शन केले आणि द्विशतक झळकावले. रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून भारतीय संघात पुनरागमन करण्याकडे त्याचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us