WTC Final Ind vs Aus: विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ आमने – सामने… कोण मोडणार? रिकी पाँटिंगचा विक्रम

  • Written By: Published:
WTC Final Ind vs Aus: विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ आमने – सामने… कोण मोडणार? रिकी पाँटिंगचा विक्रम

WTC Final Ind vs Aus: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियन संघाचा 2-1 असा पराभव केला, त्यामुळे तो नव्या उत्साहाने मैदानात उतरणार आहे. तसे, इंग्लिश परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करणे सोपे होणार नाही.

चाहत्यांच्या नजरा कोहली-स्मिथवर

या सामन्यात सर्वांच्या नजरा दोन दिग्गजांवर खिळल्या आहेत. एक भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि दुसरा ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ. अंतिम सामन्यात कोहली आणि स्मिथ आपापल्या संघासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. या अंतिम सामन्यात या दोन्ही फलंदाजांना मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांची 8-8 शतके आहेत. सध्या, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत दोन्ही खेळाडू सध्या रिकी पाँटिंग आणि सुनील गावस्कर यांच्यासोबत संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अशा परिस्थितीत कोहली आणि स्टीव्ह स्मिथला पाँटिंग-गावस्करला मागे टाकण्याची संधी आहे. आता पाहावे लागेल की या दोन खेळाडूंपैकी कोण प्रथम पाँटिंग-गावसकरचा विक्रम मोडतो?

Wrestlers Protest : विश्वविजयी ‘टीम 83’ कुस्तीपटूंच्या पाठिशी; क्रिकेटचा ‘देव’ मात्र शांतच

 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक (11) शतके झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. विराट कोहलीने या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले. कोहलीला आता सलग दुसरे शतक झळकावण्याची संधी आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC अंतिम सामन्यातही राखीव दिवस (12 जून) ठेवण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिले स्थान पटकावले आणि टीम इंडियाने दुसरे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. असं असलं तरी, दोन्ही संघांना एक प्रकारे अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचा हक्कही होता कारण आयसीसी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या तर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे. अव्वल-2 संघांमधील अंतिम सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

हा अंतिम सामना जिंकून टीम इंडियाला गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेला ‘आयसीसी ट्रॉफी’चा दुष्काळ संपवायचा आहे. 2013 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटची ICC ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत यजमान इंग्लंडचा पराभव केला. त्यानंतर टीम इंडिया कोणत्याही आयसीसी स्पर्धेत चॅम्पियन बनलेली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube