BJP चा कारभार आणीबाणीपेक्षा वाईट, तुमच्या एकाही नेत्यावर ईडीची कारवाई का झाली नाही?, कडूंचा सवाल

BJP चा कारभार आणीबाणीपेक्षा वाईट, तुमच्या एकाही नेत्यावर ईडीची कारवाई का झाली नाही?, कडूंचा सवाल

Bacchu Kadu : प्रहारचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सत्ताधारी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. भाजप आणीबाणीपेक्षाही (emergency) वाईट वागली हे संपूर्ण देशाला माहित आहे. हे लोक रामाचे खरे भक्त असतील तर त्यांनी सांगावं, आजपर्यंत भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची (ED) कारवाई का झाली नाही? असा सवाल कडू यांनी केला.

फडणवीसांनीच अबू आझमींचा बोलायला लावलं; इम्तियाज जलील यांचा दावा 

सरकारमध्ये भावनाशून्य लोक
बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी अंदाज समितीच्या (Estimates Committee) अध्यक्ष व सदस्यांच्या 2 दिवसांच्या जेवणावर चांदीच्या थाळीचा वापर करून लाखोंचा खर्च करण्यात आल्याची उघड झालं. याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, या सरकारमध्ये अत्यंत भावनाशून्य लोक बसले आहेत. त्यांना अजिबात संवेदना नाहीत. आज राज्यात दररोज १०-१५ शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोजगार हमीच्या मजुरांना वेळेवर पगार मिळत नाही. एकीकडे पैसे नसल्याचं सांगायच आणि दुसरीकडे अशी उधळपट्टी करायची. हे पाहून सामान्य लोकांना किती वेदना होत असतील याची कुणालाही कल्पना नाही. हे सरकार प्रचंड भावनाशून्य आहे, अशी टीका कडू यांनी केली.

भाजप नेत्यावर ईडीची चौकशी का लागली नाही?
दरम्यान, एखाद्या कसायाने एकदा चारा खाऊ घालायचा आणि दररोज गायी-म्हशी कापायच्या याला काय अर्थ आहे? तुम्ही वेगळे काय करता? जर तुम्ही रामाचे खरे भक्त असाल तर सांगा की आतापर्यंत एकाही भाजप नेत्यावर ईडीची चौकशी का लागली नाही? तुमच्यामध्ये एकही भ्रष्टाचारी नाही का? सर्व हरिश्चंद्राची अवलाद आहेत का? असा सवाल करत तुम्ही आणीबाणी पेक्षाही वाईट वागले, हे संपूर्ण देशाला माहित आहे, असंही बच्चू कडू असेही म्हणाले.

पुढं बोलताना ते म्हणाले की, अनेकांना वाटत होतं माझ्या मनात पदाची लालसा आहे. पण हे चुकीचे आहे. आमदारकी गेले किंवा अध्यक्षपद गेले म्हणजे बच्चू कडू थांबणार नाही. मला एखादी जेलवारी झाली तरी मी थांबणार नाही. पण हुकूमशाही किती करावी याची काही मर्यादा असते. अपात्र केले, यांची फाईल एक महिना कुठे दाना खात होती? अजूनही मला अपात्रतेची नोटीस मिळाली नाही. हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

ते म्हणाले, भाजपमधील काही जण लोक आम्हाला बदनाम करत आहेत. बँक तोट्यात असल्याची आवई उठवत आहेत. संचालकांनीही बँकेची बदनामी करू नये. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करेन, कॉम्प्रमाईज होईल असे अनेकांना वाटत होते. पण असे काहीही होणार नाही. कारण माझे आडनावाच कडू लागले आहे, असं ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube