मोठी बातमी! समीर भुजबळ यांचा मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा, विधानसभेच्या रिंगणात उतरणार

  • Written By: Published:
मोठी बातमी! समीर भुजबळ यांचा मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा, विधानसभेच्या रिंगणात उतरणार

Sameer Bhujbal : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. माहितीनुसार ते आता नांदगाव  विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे पाठवला आहे.

त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, साधारण वर्षभरापूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सुपूर्त केली होती. ही जबाबदारी पार पडत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण संघटन मजबुतीने उभे केले. यामध्ये जिल्हाध्यक्ष पासून बूथपर्यंत संघटनेची बांधणी आपण केली. मात्र भुजबळ कुटुंबीयांच्या ऋणानुबंध असलेल्या नांदगावमध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातले वातावरण अतिशय दूषित झालेले असून येथील नागरिक भयभीत आहे.

नांदगाव मधील कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबतली कैफियत आपल्यासमोर मांडली होती. नांदगावमधील नागरिकांची वाढत असलेली मागणी आणि नांदगावमधील दहशतीचे वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्ष पदाचा मी राजीनामा देत आहे. तो आपण स्वीकारावा अशी नम्र विनंती आपण आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे. असं समीर भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

INDvsNZ : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, वॉशिंग्टनची ‘सुंदर’ गोलंदाजी, भारताचा शानदार कमबॅक

माध्यमांशी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून मी नांदगाव – मनमाड विधानसभा मतदारसंघात दौरे करत आहे. मी इथे पंकज भुजबळ यांच्यासोबत इथे 10 वर्ष काम केले आहे. आमचं संघटन इथे मजबूत आहे. गावपातळीवर आमचं संघटन आहे. 2009 मध्ये मी खासदार होतो तेव्हा देखील मी पक्षाचे चिन्ह गावपातळीवर पोहोचवण्याचे काम केले. असं माध्यमांशी बोलताना समीर भुजबळ म्हणाले.

पुढे बोलताना समीर भुजबळ म्हणाले, आज नांदगावची जी परिस्थिती आहे ती भयानक आहे. या ठिकाणी 10 वर्षात पंकज भुजबळ यांनी केलेल्या कामांना खीळ बसली होती. युतीचे सरकार आहे. नांदगावमध्ये सुद्धा संधी मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध करून दिली होती मात्र या मतदारसंघात विकासाचे कामे झाली नाही असं देखील माध्यमांशी बोलताना समीर भुजबळ म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube