WTC Final : विराट कोहलीचा हा फोटो पाहून तुम्हाला देखील दुःख होईल, पहा पराभवानंतरचे भावनिक फोटो

  • Written By: Published:
1 / 6

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर विराट कोहली उदास दिसत होता.

2 / 6

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी फ्लॉप ठरली. विराट कोहली पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात 49 धावा करून बाद झाला. भारताच्या पराभवानंतर चाहते दु:खी झाले होते. या सामन्याचे असे काही फोटो आहेत, जे तुम्हाला भावूक करणार आहेत.

3 / 6

कोहलीचे चाहते त्याच्याबद्दल खूप भावूक असतात. विराट बाद झाल्यानंतर त्याच्याबद्दल ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफीजवळून जात होता, तेव्हा त्याचा चेहरा उदास होता. हा फोटो सोशल मीडियावर खूप शेअर झाला आहे.

4 / 6

अजिंक्य रहाणेचे बाद होणेही टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नव्हते. रहाणेने पहिल्या डावात 89 धावा केल्या. मात्र दुसऱ्या डावात 46 धावा करून तो बाद झाला. रहाणे आणि शार्दुलच्या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 296 धावा केल्या.

5 / 6

रोहित शर्माचे बाद होणेही टीम इंडियाचे नुकसानच होते. पहिल्या डावात अवघ्या 15 धावा करून रोहित बाद झाला. मात्र त्याने दुसऱ्या डावात संघाला चांगली सुरुवात करून दिली. रोहित 43 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

6 / 6

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा आणि दुसऱ्या डावात 270 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ पहिल्या डावात 296 धावा तर दुसऱ्या डावात 234 धावाच करू शकला. अशाप्रकारे त्यांना 209 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube