शिर्डी लोकसभेसाठी चुरस वाढली… महाविकास आघाडीकडून आणखी एका पक्षाची दावेदारी

शिर्डी लोकसभेसाठी चुरस वाढली… महाविकास आघाडीकडून आणखी एका पक्षाची दावेदारी

Shirdi LokSabha : भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट महत्त्वाची आहे. तसेच महाविकास आघाडीचे राज्यातील लोकसभेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित रणनिती आखणे गरजेचे आहे. यासाठी आता महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना बैठकीला बोलवण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) शिष्टमंडळाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे केली आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी, मुंबई सेक्रेटरी कॉ. मिलिंद रानडे व राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. अशोक सुर्यवंशी यांनी मुंबईत नाना पटोले यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार हुसेन दलवाई उपस्थित होते.

पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ठरल्याप्रमाणे पक्षाच्या वतीने त्यांना पत्र देण्यात आले. या पत्रात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने म्हटले की, भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष या आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्यातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची एकत्रित मिटिंग होणे आवश्‍यक आहे. राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षाशिवाय इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षही कार्यरत आहेत.

संभाजीराजे छत्रपतींची लोकसभा निवडणुकीसाठीची हालचाली सुरू : संजय पोवार यांच्यावर मोठी जबाबदारी

भाजपचा पराभव करण्यासाठी आघाडीतील इतर सर्व पक्षांशी विचारविनिमय होणे आवश्‍यक आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात परभणी व शिर्डी अशा दोन लोकसभेच्या जागा लढविण्याची तयारी केली आहे. तसेच इतर घटक पक्षांनीही काही विचार केला असेलच. भाकपने परभणीतून कॉ. राजन क्षीरसागर व शिर्डीतून कॉ. बन्सी सातपुते यांचे नाव निश्‍चित केले आहे.

Ramdas Athavle यांच्या दौऱ्यापूर्वीच नगरमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीवरून आरपीआयमध्ये घमासान

भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट दिसायला हवी व राज्यात इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी मिळून रणनिती तयार करायला हवी असे कम्युनिस्ट पार्टीने सुचवले आहे. राज्यातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र आहेत, इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचा पराभव करू शकतात, असा संदेश जनतेपर्यंत जाणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी नाना पटोले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व घटक पक्षांना 25 जानेवारी रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात येईल, असे सांगितले आहे.

‘आता भाजपमुक्त श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मोदींची तुलना, शक्यच नाही’; ठाकरेंनी ठणकावलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube