Satej Patil – Amal Mahadik : कारखान्याची कागदपत्रं घेऊन बिंदू चौकात या; अमल महाडिक यांच सतेज पाटलांना आव्हान

  • Written By: Published:
Satej Patil – Amal Mahadik : कारखान्याची कागदपत्रं घेऊन बिंदू चौकात या; अमल महाडिक यांच सतेज पाटलांना आव्हान

राजाराम कारखान्यावर केलेल्या आरोपाची कागदपत्रे घेऊन संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात हजर आहे. तुम्हीदेखील डी. वाय. पाटील साखर कारखान्याची कागदपत्रं घेऊन बिंदू चौकात यावं. असं खुलं आव्हानच अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी आमदार सतेज पाटलांना (Satej Patil)  दिलं आहे. राजाराम सहकारी कारखाना निवडणुकीवरून पाटील आणि महाडिक गटामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहे.

आज महाडिक गटाकडून राजाराम कारखान्याच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यावेळी अमल महाडिक बोलत होते. त्यांनी पाटील गटावर जोरदार टीका केली सोबतच त्यांनी त्यांना खुले आव्हान देखील दिले आहे. यावेळी अमल महाडिक म्हणाले की बंटी पाटील मी तुमची वाट बघतोय. राजाराम कारखान्यावर केलेल्या आरोपाची कागदपत्रे घेऊन संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात हजर आहे. तुम्हीदेखील डी. वाय. पाटील साखर कारखान्याची कागदपत्रं घेऊन बिंदू चौकात यावं. असं खुलं आव्हानच अमल महाडिक यांनी आमदार सतेज पाटलांना दिलं आहे.

सतेज पाटील हे 96 कुळी पाटील नव्हे तर मनोरुग्ण पाटील… महाडिकांची टीका

यावेळी बोलताना माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, महादेवराव महाडिक यांनी 27 वर्षे हा कारखाना सभासदांचा ठेवला. कारखान्याचा 7/12 छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या नावाने आहे. मात्र बंटी पाटलांनी कोणाचे तरी ऐकून तोंडावर पडू नये.

आम्ही 37 वर्षाचा अहवाल तुम्हाला दाखवतो, तुम्ही एक वर्षाचा दाखवा. तुमची भाषा मग्रुरीची असून, खोटारडेपणा हे तुमचं सूत्र आहे. आपण हे विसरू नये की तुम्हाला महादेवराव महाडिकांनी प्रथम आमदार केलं होतं. विधानपरिषदेला मी माघार घेतली म्हणून तुम्ही आमदार झाला. असं टीकास्र अमल महाडिक यांनी सोडलं.

याशिवाय या मेळाव्यात खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, बंटी पाटील यांचा साधा टनभर ऊस हा कारखान्याला जात नाही. आणि सारखं सारखं सांगतो मी पाटील आहे, पाटील आहे. सतेज पाटील हा मनोरुग्ण व्यक्ती आहे, खोटारडा माणूस आहे. सूडबुद्धीने काम करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नेता राहिला आहे. सतेज पाटील तुमचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत होतील. अशा कडव्या शब्दात महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे.

Prithviraj Chavan मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते?

पुढे बोलताना ते म्हणाले की, बंटी पाटील कोल्हापुरला लागलेला शाप आहे. 15 वर्षे आमदार, 8 ते 9 वर्षे मंत्री होते. त्यांनी कोल्हापुरचा काय विकास केला? सतेज पाटील कोल्हापुरला लागलेला शाप नाहीतर शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळही आहेत,” अशी घणाघाती टीका महाडिक यांनी केली. दरम्यान ही निवडणूक एकतर्फी होत, बंटी पाटलांच्या सर्व उमेदवारांची डिपॉझिट रक्कम जप्त होणार, असा दावा यावेळी महाडिक यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube