कुंपणच शेत खातंय! धनदा कार्पोरेशन लिमिटेडच्या लिलावावरून अंबादास दानवे संतापले, थेट CM फडणवीसांना पाठवलं पत्र

Ambadas Danve on Auction Process of Dhanada Corporation Limited : धनदा कार्पोरेशन लिमिटेडच्या लिलाव प्रक्रियेवरून अंबादास दानवे (Ambadas Danve) संतापल्याचं समोर आलंय. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनाच पत्र पाठवलं आहे. कुंपणच शेत खातंय, या शब्दांत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. धनदा कार्पोरेशन लिमिटेड आणि हॉटेल VITS, छत्रपती संभाजीनगर या प्रकरणी महसूल प्रशासनामार्फत अत्यल्प मूल्यावर लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. लिलाव प्रक्रिया पूर्वनियोजित व विशिष्ट कंपनीस लाभ मिळावा, या हेतूने राबविण्यात आल्याचा आरोप केला जातोय.
विशेषतः संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तपास यंत्रणांतील काही (Chhatrapati Sambhajinagar) अधिकाऱ्यांनी भागधारकांतील विशिष्ट घटकांच्या दबावाखाली किंवा आर्थिक हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेली आहे. या हॉटेलच्या सन 2012 मध्ये करण्यात आलेल्या अधिकृत मूल्यांकन अहवालानुसार सदर मालमत्तेची किंमत 110 कोटी इतकी निश्चित करण्यात आली होती.
‘मोदींना फोन लावा…’ राहुल गांधींवरील टीकेवरुन यशोमती ठाकूर संतापल्या, सत्यजित तांबेंना दिलं चॅलेंज
महागाई निर्देशांक आणि स्थावर मालमत्तेच्या बाजारभावानुसार सद्य:स्थितीत सदर मालमत्तेचे मूल्य यापेक्षा कितीतरी अधिक आहे. मात्र, मालमत्तेची लिलाव प्रक्रिया केवळ अत्यल्प प्रमाणात केल्याने शासनाच्या महसुलाचे नुकसान झाले असल्याचं देखील ( Dhanada Corporation Limited and Hotel VITS) अंबादास दानवे यांनी म्हटलंय. संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र अन् उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच, सदर मालमत्तेचे कोणतेही अंतिम हस्तांतरण होण्यापूर्वी संपूर्ण वस्तुस्थिती मा. सर्वोच्च न्यायालयासमोर विधिवतरीत्या सादर करण्यात यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सरकारी कुंपण कसे शेत खाते त्याचे हे ज्वलंत उदाहरण.. @CMOMaharashtra
धनदा कार्पोरेशन लिमिटेड व हॉटेल VITS, छत्रपती संभाजीनगर या प्रकरणी महसूल प्रशासनामार्फत अत्यल्प मूल्यावर लिलाव प्रक्रिया रराबविण्यात आली असून लिलाव प्रक्रिया पूर्वनियोजित व विशिष्ट कंपनीस लाभ मिळावा या हेतूने… pic.twitter.com/KzXG3puQWm
— Ambadas Danve (@iambadasdanve) May 28, 2025
तसेच या मालमत्तेचे कोणतेही अंतिम हस्तांतरण होण्यापूर्वी संपूर्ण वस्तुस्थिती सर्वोच्च न्यायालयासमोर विधिवत्तरीत्या सादर करण्याची मागणीही दानवे यांनी लावून धरली आहे. धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत आहे. या कंपनीचे 5 हजारपेक्षा अधिक भागधारक आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल VITS ही कंपनीची प्रमुख मालमत्ता असून, सन 2008 पासून ही मालमत्ता कार्यरत आहे. या कंपनीने हॉटेलच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार व व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. महसूल प्रशासनामार्फत सदर मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया राबविणे अनुचित ठरू शकते, असे निदर्शनास आणून देण्याच्या दृष्टीने 6 मे रोजी दानवे यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले होते.
MSP मध्ये वाढ, कर्जमाफी अन्…, केंद्रीय मंत्रिमंडळाचे शेतकऱ्यांसाठी 2 मोठे निर्णय
परंतु शासनाकडून या निवेदनाकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलंय. 20 मे रोजी मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली. या दोन लिलावांदरम्यान केवळ तीन कंपन्यांनी भाग घेतला आहे. दोन्ही सी.टी.एस. क्रमांकाच्या बोली, रकमेतील अत्यल्प फरक, लिलावात भाग घेणाऱ्या कंपन्यांची संख्या आणि स्पर्धात्मकतेचा अभाव पाहता, सदर लिलाव प्रक्रिया पूर्वनियोजित व विशिष्ट कंपनीला लाभ मिळावा या हेतूने राबविण्यात आल्याचा आरोप दानवे यांनी केलाय.
विशेषतः संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तपास यंत्रणातील अधिकाऱ्यांनी भागधारकांतील विशिष्ट घटकांच्या दबावाखाली तसेच आर्थिक हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे. न्यायालयीन आदेशांशिवाय 1 फेब्रुवारीपासून हॉटेल बंद करण्यात आले असून व्यवसायिक स्वरूपात सुरु असलेल्या हॉटेलमधून निर्माण होणारा आर्थिक नफा (सुमारे 6 कोटी रुपये) मा. न्यायालयात जमा असूनही कर्मचारी पगार, कंपनीचे सूचीबद्धता शुल्क व नियमित खर्च प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. परिणामी, सुमारे 150 कर्मचारी, लघु व्यावसायिक व पुरवठादार यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याची बाब विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे.