‘मोदींना फोन लावा…’ राहुल गांधींवरील टीकेवरुन यशोमती ठाकूर संतापल्या, सत्यजित तांबेंना दिलं चॅलेंज

‘मोदींना फोन लावा…’ राहुल गांधींवरील टीकेवरुन यशोमती ठाकूर संतापल्या, सत्यजित तांबेंना दिलं चॅलेंज

Call PM Modi Yashomati Thakur Challenge To Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) कॉंग्रेस नेत्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, असं वक्तव्य केलंय. यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय. यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेसच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कॉंग्रेस एक विचार असून तो संपणार नाही, असं देखील सत्यजीत तांबे यांनी (Satyajeet Tambe) म्हटलं होतं. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी (Yashomati Thakur) देखील सत्यजीत तांबे यांच्यावर हल्लाबोल केल्याचं समोर आलंय.

राहुल गांधी अॅक्सेसेबल नाही, असे म्हणत सत्यजीत तांबे यांनी (Congress) नेतृत्वावरच टीका केली होती. यावरून आता काँग्रेस नेत्यांकडून देखील तांबेंना प्रत्त्युतर दिलं जातंय. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्यावरुन सत्यजित तांबे यांना सवाल (Maharashtra Politics) केलेत. यासोबतच त्यांनी तांबेंना एक चॅलेंज सुद्धा दिलंय.

प्रेम प्रकरणापासून छळापर्यंत… मास्टरमाईंड करिश्मा हगवणेच! संपूर्ण कटाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

सत्यजित तांबे काँग्रेसचे असून आता ते अपक्ष निवडून आलेत. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी पंतप्रधान मोदींना फोन लावावा. याशिवाय महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने मोदींना फोन करावा. मोदीजींनी तासाभरामध्ये कुणाला अपॉइंटमेंट दिल्यास आम्ही पण तसंच बोलू शकतो, असे म्हणत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सत्यजित तांबे यांनाच प्रति चॅलेंज दिलंय.

ऑपरेशन सिंदूर आणखी आठवडाभर….; पाकला कंटाळलेल्या बलुच नेत्याचं थेट मोदींना भलं मोठं पत्र…

राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये मिसळतात, त्यांना भेटतात. प्रत्येक पक्षाचा एक प्रोटोकॉल असतो, तो फॉलो केला जातो, असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. ज्यांनी पक्ष सोडून अलिप्त राहण्याचा विचार केलाय. त्यांना पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही, असं म्हणत सत्यजित तांबेंवर जोरदार टीका केलीय. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांपासून सत्यजित तांबे काँग्रेसमध्ये वेगळे पडले आहेत. त्यांचं पक्षातून निलंबनही करण्यात आलं होतं. परंतु, अजूनही ते काँग्रेसमध्येच असल्याचं सांगितलं जातंय.

राहुल गांधींना धमकी देणं सोपं नसून कोणी वायफळगिरी करत असल्यास आम्ही खबरदारी घेतो. आम्ही शांततेने वागणारी अहिंसेची मंडळी आहोत. पण, आता कलयुग असून आम्हाला सुद्धा कलयुगासारखं वागता येतं, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी विरोधकांना इशारा दिलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube